मुंबई/नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
ब्रेकिंग! भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 11:24 IST
पावसाळी अधिवेशनात करण्यात आलेली निलंबनाची कारवाई न्यायालयाकडून रद्द; भाजपला दिलासा
ब्रेकिंग! भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ठाकरे सरकारला धक्का
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}