शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला बसला अवकाळी फटका

By admin | Updated: March 16, 2015 02:48 IST

विदर्भात नागरपूरसह चार जिल्ह्यांना रविवारी गारपिटीचा तडाखा बसला असून, अनेक भागांत गारांचा खच पडला होता; तर खान्देश, सांगली व पंढरपूरला

मुंबई : विदर्भात नागरपूरसह चार जिल्ह्यांना रविवारी गारपिटीचा तडाखा बसला असून, अनेक भागांत गारांचा खच पडला होता; तर खान्देश, सांगली व पंढरपूरला अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे द्राक्षे, संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, मिरची, सूर्यफूल, जवस आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, नागपूरच्या उमरेड तालुक्यातील गौरी गणेशपूर येथे प्रभाकर मणिराम तेलरांधे (४७) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. नागपूर शहरासह हिंगणा, काटोल व कळमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली़ यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव, दराटी, जेवली व अन्य गावांमध्ये सुमारे अर्धा तास गारपीट झाली तर शहरात सरी कोसळल्या. धामणगाव तालुक्यालाही अवकाळी गारपिटीचा फटका बसला.