शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 2:04 AM

एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत.

ठाणे : एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत. विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधीच परस्परांवर कंबरेखालचे वार केले नाहीत. परंतु, राजकारणात काही लोक तोंडावर गोड बोलतात, कौतुक करतात, आपले मित्र असल्याचे भासवतात. मात्र, प्रत्यक्षात ते कंबरेखाली वार करून मोकळे होतात. अशा लोकांमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटते. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना इतके कम्फर्टेबल वाटले नसल्याची जाहीर कबुली आव्हाड यांनी दिली.

मातोश्रीवर एकदा गेलो होतो, तेव्हा ममता, माया व प्रेम काय असते, ते कळले होते, असेही ते म्हणाले. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविली गेली आहे. परंतु, मुंब्य्रातदेखील अशा अनेक अनधिकृत, धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे येथेही ही योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. किंबहुना, एमएमआर रिजनमध्ये क्लस्टर योजना राबविल्यास त्यातून सर्वांनाच हक्काचे घर मिळेल, असे ते म्हणाले.

एसआरएच्या माध्यमातून ठाण्यात ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडा किंवा तत्सम योजनांमध्ये १० टक्के राखीव कोटा ठेवला जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील एसआरएचे नियम समान केले जाणार आहेत. पारसिकनगर येथे २७ एकरचा भूखंड आहे. त्यावर दिवंगत अभिनेत्री नूतन यांचे घर आहे. तिथे पक्षी अभयारण्य, नवा प्रकल्प ठाणेकरांसाठी राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय, गावठाणे आणि कोळीवाड्यांतील रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

एमएमआर रिजनचे वेगळे प्राधिकरण करणार- शिंदे

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरएचा विकास करताना एमएमआर रिजनमध्ये क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. या शिवाय, एमएमआरए क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमावेळी दिली.च्यानिमित्ताने या भागाचा विकास त्याच ठिकाणी होईल.

धोकादायक किंवा अनधिकृत इमारतींचा विकासही त्याच ठिकाणी होईल. ठाणे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ठाण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. परंतु, ठाणेकरांचा २५ वर्षांपासून विश्वास कायम आहे, असे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका मोठी असली तरी ठाणे महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे क्लस्टरच्या विकासात कोणताही दुजाभाव केला जाणार नसल्याचे शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे