शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळातील वसुली होणार रद्द

By admin | Updated: November 1, 2015 01:50 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.जे वाहक-चालक सेवेत आहेत, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाऊ नये आणि निवृत्त झालेल्या ज्या वाहन-चालकांच्या देण्यांमधून ही रक्कम कापण्यात आली आहे, त्यांना ती परत करण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. महामंडळाने या नोटिसा २ फेब्रुवारी २००५ रोजी बजावल्या होत्या. प्रत्येकाकडून सरासरी चार ते पाच हजार रुपयांची वसुली केली जाणार होती. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दाद मागितली असता, औद्योगिक न्यायालयाने सप्टेंबर २००५ मध्ये या वसुली नोटिसा रद्द केल्या होत्या. महामंडळाने केलेले अपिल हायकोर्टात प्रलंबित होते. मध्यंतरी ज्यांच्याकडून वसुली करायची आहे, असे ते निवृत्त झाले, तर वसुली करता येणार नाही, असा अर्ज महामंडळाने केला होता. तेव्हा न्यायालयाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देय देण्यांमधून ही वसुलीची रक्कम कापून घ्यावी व ती बँकेत ठेवावी, अशी अंतरिम मुभा दिली होती. आता अंतिम सुनावणीनंतर न्या. रवींद्र घुगे यांनी महामंडळाचे अपिल फेटाळले व वसुली रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)काय होते नेमके प्रकरण?लांब पल्ल्याच्या बस घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांनी सलग दोन दिवस ड्युटी केली, तर मूळ आगारात परत आल्यावर तिसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी दिली जाते. महामंडळाच्या लातूर विभागात १९९१ ते २००० या १० वर्षांत अनेक वाहक-चालकांना अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष काम न करताही, त्यांची हजेरी लावून त्यांना त्या दिवसाचा पगार दिला गेला, असे डिसेंबर २००१ मध्ये केलेल्या लेखा परीक्षणात स्पष्ट झाले. लेखा परीक्षकांनी अशा प्रकारे एकूण दोन कोटी ५१ लाख ४३ हजार रुपये अनाठायी दिले गेल्याचे नमूद केले. त्यानंतर महामंडळाने संबंधित वाहक-चालकांकडून ही रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू केली.अधिकाऱ्यांना पाठीशी घातलेन्यायालयाने म्हटले की, खरे तर ‘तिसऱ्या दिवशी’ काम न करूनही वाहक-चालकांची हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना महामंडळाने जबाबदार धरायला हवे होते, पण तसे केले गेले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हजेरीच्या बनावट नोंदी तयार केल्या, असे महामंडळाचे म्हणणे नाही किंवा त्यास कोणताही पुरावा नाही. महामंडळाने या कर्मचाऱ्यांवर रीतसर खातेनिहाय चौकशीही केलेली नाही. अशा परिस्थितीत पगारातून दिले गेलेले एक दिवसाचे जादा पैसे महामंडळ वसूल करू शकत नाही.