शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बीकेसीमध्ये एसआरए घोटाळा

By admin | Updated: December 3, 2014 04:00 IST

एचडीआयएल कंपनीचे दहा संचालक, तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आणि मोतीलाल नेहरू नगर गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे

मुुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मोतीलाल नेहरूनगर झोपडपट्टीत राबविण्यात आलेल्या एसआरए योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) विकासक एचडीआयएल कंपनीचे अध्यक्ष राकेशकुमार वाधवान यांच्यासह तत्कालीन एसआरए सीईओ देबाशिष चक्रवर्ती, उज्ज्वल उके यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. एचडीआयएल कंपनीचे दहा संचालक, तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आणि मोतीलाल नेहरू नगर गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी यांनाही याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, त्याचा वापर करून प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवणे, त्यासाठी कट रचणे, शासनाची आर्थिक फसवणूक करणे असे गंभीर गुन्हे या सर्वांविरोधात नोंदविण्यात आले आहेत. बीकेसीतल्या अत्यंत मोक्याच्या भूखंडावर वसलेल्या मोतीलाल नेहरू नगर झोपडपट्टीत २००४मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात पात्र असूनही अपात्र ठरवून गाळा नाकारण्यात आलेल्या शमीम खान यांनी माहिती अधिकाराचा वापर करून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला. एचडीआयएल कंपनीसोबत हातमिळवणी करून एसआरए, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कसा घोटाळा केला हे खान यांनी पुराव्यांसह एसीबीसमोर ठेवले आणि कारवाईची मागणी केली. मात्र एसीबीने कारवाई न केल्याने अखेर खान यांनी विशेष सत्र न्यायालयात खासगी तक्रार केली. तक्रारीची सुनावणी पूर्ण करून न्या. एस. व्ही रणपिसे यांनी याप्रकरणी दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश एसीबीला दिले. त्यानुसार एसीबीने गुन्हा नोंदविला. या सुनावणीत अ‍ॅड. युसूफ खान आणि अ‍ॅड. अंजली अवस्थी यांनी तक्रारदाराच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद केला.  मुळात ज्या भूखंडावर एसआरए प्रकल्प उभा राहिला त्या भूखंडाची मालकी एमएमआरडीएकडे आहे. त्यामुळे या भूखंडावरील नियोजन करण्याचे हक्क एसआरएकडे नसून एमएमआडीएकडे होते. शिवाय हा भूखंड गणनाकृत झोपडपट्टी (सेन्सस्ड स्लम) म्हणून जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे या भूखंडावर एसआरए प्रकल्प होऊच शकत नव्हता.मात्र २००४मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्याने हा भुखंड सेन्सस्ड स्लम असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. त्याच प्रमाणपत्राच्या आधारे तत्कालीन एसआरए सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांनी एचडीआयएलला प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या दिल्या. प्रकल्पासाठी ७० टक्के झोपडीधारकांची मंजुरी आवश्यक असते. ही परवानगी मिळविण्यासाठी एचडीआयएल कंपनीने बनावट झोपडीधारक उभे केले. त्यासाठी त्यांनी बोगस रेशन कार्ड आणि लाईट बिले तयार करून घेतली. या रेशनकार्ड किंवा लाईट बिलांची शहानिशा उप किंवा अप्पर जिल्हाधिकारी करतात. त्यासाठी संबंधीत वीज कंपनी किंवा रेशनिंग विभागाकडून अहवाल मागविला जातो. मात्र या प्रकरणात असा कोणताही अहवाल न मागविताच सर्व झोपडीधारक पात्र आहेत असे जाहीर केले. एचडीआयएलने अवैधपणे २.५ एफएसआय मिळवून जास्तीचे बांधकाम केले. उभारलेल्या प्रकल्पातील विक्रीसाठी बांधलेले फ्लॅट विकलेच; पण प्रकल्पग्रस्तांचे फ्लॅटही विकले.