शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणावादी व्यक्तींची नक्षल्यांकडून मुस्कटदाबी

By admin | Updated: July 27, 2014 01:24 IST

गोरगरिब जनतेचे भले करण्याची भाषा वापरणारे नक्षलवादी सुशिक्षित आणि सुधारणावादी व्यक्तींची मुस्कटदाबी करीत आहे. मनाप्रमाणे ऐकत नसेल तर त्याला पोलिसांचा खबऱ्या ठरवून त्याची हत्या करतात.

गोरगरिबांची कुचंबना : धाडसी मंगला अजमेरचे कथन नागपूर : गोरगरिब जनतेचे भले करण्याची भाषा वापरणारे नक्षलवादी सुशिक्षित आणि सुधारणावादी व्यक्तींची मुस्कटदाबी करीत आहे. मनाप्रमाणे ऐकत नसेल तर त्याला पोलिसांचा खबऱ्या ठरवून त्याची हत्या करतात. गावाच्या विकासाची चर्चा करतो म्हणूनच आपल्या पतीची नक्षलवाद्यांनी हत्या केली, अशी माहिती मंगला राजू अजमेर या आदिवासी महिलेने आज पत्रकारांना दिली. नक्षल्यांप्रमाणेच विकासाचा दावा करणाऱ्या सरकारचाही फोलपणा मंगला यांनी उघड केला. जानेवारी २०१४ मध्ये नक्षलग्रस्त भागात शोधयात्रा काढणाऱ्या आणि या भागातील आदिवासी, गोरगरिब जनतेच्या व्यथा समजून घेणाऱ्या शोधयात्रेतील काही जणांनी ‘भूमकाल संघटन‘ काढले आहे. नक्षलवाद्यांचा वैचारिक विरोध करून या चळवळीचा फोलपणा उघड करण्याचा संकल्प घेणाऱ्या भूमकाल संघटनने आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. मंगला अजमेर या संघटनेच्या सदस्य आहेत. डोळ्यादेखत पती गमावणाऱ्या आणि याचवेळी नक्षल्यांना गोळ्या मारा असे आवाहन करणाऱ्या धाडसी मंगला अजमेर नक्षल्यांच्या क्रूरपणाचा परिचय सर्वांना व्हावा या उद्देशाने पत्रकारांपुढे आल्या. त्यांना अक्षय (वय १५), अजय (वय १२) आणि पवन (वय ९) अशी तीन मुले आहेत. त्या आपल्या पती आणि मुलांसोबत गडचिरोलीतील किष्टापूर गावात राहायच्या. पतीचे छोटेसे किराणा दुकान होते. ४३५ लोकसंख्येच्या या गावात येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या किराणा दुकानात यायची. पोलीसही बसायचे. गावाचा विकास झाला पाहिजे. रस्ते, लाईट आले पाहिजे. शाळा अन् आरोग्य सेवाही किष्टापुरात यावी, असे राजू अजमेरचे प्रयत्न होते. नक्षल्यांना ते नको होते. त्यामुळे ते वारंवार धमक्या द्यायचे. २६ जानेवारीला पतीच्या पुढाकाराने गावात झेंडावंदनाचा (गणराज्य दिनाचा) कार्यक्रम झाला. परिणामी नक्षलवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी (२७ जानेवारी) राजू अजमेर आणि अन्य एक अशा दोघांना गावकऱ्यांसमोर गोळ्या घालून ठार मारले. यावेळी काही नक्षल्यांनी आपल्याला पकडून ठेवले होते. ‘तुम्ही गोरगरिबांच्या हिताच्या गोष्टी करता. आम्ही गरीब आहोत, आमचे घर का उद्ध्वस्त करता‘, असा प्रश्न मंगला यांनी नक्षलवाद्यांना विचारला. यावर ‘तुलाही गोळ्या घालू का‘, असे नक्षल्यांनी विचारले. मंगलाने त्यांना शिव्याशाप देत ‘हिंमत असेल तर घाला गोळ्या‘ असे म्हणत आव्हान दिले. नक्षल्यांनी तिला सोडून देत गावातून पळ काढला. या घटनेमुळे अजमेर कुटुंबीय उद्ध्वस्त झाले. वृध्द सासू-सासरे बाजूला सहा किलोमीटर अंतरावर राहायला आहे. कर्ता मुलगा गेल्यामुळे जगायचे कसे, असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. धाडसी मंगलाने त्या गावात छोटेसे किराणा दुकान सुरू केले. मुलांचे शिक्षण आणि त्यांच्यासकट सासू-सासऱ्यांच्या उदरभरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी धाडसी मंगला प्रयत्न करते. गावातील आशा कार्यकर्ती म्हणूनही सेवा देते. यावेळी भूमकाल संघटनेचे सहसंयोजक अरविंद सोहनी यांनीही नक्षल्यांचा फोलपणा उघड केला. संघटनेचे अध्यक्ष श्याम पांढरीपांडे, संयोजक दत्ता शिर्के, रश्मी पारस्कर तसेच मंगला यांचे नातेवाईक पुनाराम चव्हाण उपस्थित होते. त्यांनीही गडचिरोलीतील भयाण वास्तवावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)