शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 3:32 PM

साखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतलामागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले२५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी

सोलापूर : यावर्षीचा साखर हंगाम घेतलेल्या सहा साखर कारखान्यांनी मे अखेरपर्यंत एफ.आर. पी.ची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे. असे असले तरी उर्वरित २५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी असल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत.

यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी गोकुळ माऊली वगळता अन्य ३० कारखान्याने १५ मे पर्यंत ८३८ कोटी ७ लाख ११ हजार रुपये इतकी थकबाकी होती. ३१ मे पर्यंत यापैकी ५ कारखान्यांनी २६९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे,पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल कॉर्पोरेशन व इंद्रेश्वर कारखान्याचा समावेश आहे. उर्वरित २५ कारखान्यांकडे ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहे.  हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेतकºयांच्या उसाचे पैसे दिले जात नाहीत; मात्र या आठवड्यात बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे चुकते करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यातील १५ कारखान्यांना सॉप्टलोन मंजूूर झाल्याने एफआरपीची रक्कम देता येणार आहे. 

कारखान्यांकडे असलेली देय रक्कम- आदिनाथ, करमाळा- दोन कोटी ३३ लाख, भीमा, टाकळी सिकंदर- १३ कोटी ३४ लाख, सिद्धेश्वर कुमठे- ४७ कोटी ९८ लाख,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील- १२ कोटी ३३ लाख, श्री विठ्ठल गुरसाळे -६७ कोटी २२ लाख,विठ्ठलराव शिंदे- ७४ कोटी ४० लाख,श्री मकाई करमाळा- २१ कोटी ७४ लाख, संत कूर्मदास- ६ कोटी ४० लाख, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील- ३२ कोटी २० लाख,  सासवड माळी शुगर-२२ कोटी ५३ लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ - ६ कोटी १९ लाख, लोकमंगल इथेनॉल भंडारकवठे १६ कोटी ५६ लाख,     सिद्धनाथ शुगर तिºहे- ३३ कोटी ५८ लाख, जकराया शुगर वटवटे-१३ कोटी ५४ लाख,  भैरवनाथ विहाळ- ५ कोटी ६६ लाख, फॅबटेक- ५ कोटी २९ लाख, भैरवनाथ लवंगी- ९ कोटी ५७ लाख, युटोपियन कचरेवाडी- २७ कोटी १९ लाख, गोकुळ-२७ कोटी ५८ लाख,मातोश्री लक्ष्मी शुगर- २८ कोटी ८४ लाख, भैरवनाथ आलेगाव-३० कोटी ६९ लाख, बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी- ८ कोटी ११ लाख, सीताराम महाराज खर्डी- १० कोटी ५७ लाख,जयहिंद शुगर- १६ कोटी ९० लाख, विठ्ठल रिफायनरी, पांडे- २८ कोटी ७० लाख. 

शासनाकडून बफर स्टॉक, गोडावून भाडे आदीचे येणे आहे ती रक्कम मिळाली तरी शेतकºयांचे संपूर्ण पैसे देता येतील. सॉप्टलोन  मिळाले नसल्याची अडचण आली. तरीही आठवडाभरात शेतकºयांचे पैसे देण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत ९३ टक्के पैसे दिले आहेत.- बब्रुवाहन माने-देशमुखचेअरमन, जयहिंद शुगर, आचेगाव

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagricultureशेती