शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:07 AM

पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले.

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले. मतदान यंत्रांमधील गडबडींमुळे भाजपाला विजय मिळाला, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट तर केले पण शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.निकालानंतर आयोजित पत्रपरिषदेत ठाकरे यांनी पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी मागणी करताच मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी मतदानाची अंतिम आकडेवारी त्यांच्या सहीने जारी केल्यानंतर लाखभर मतदान कसे वाढले याची चौकशी झाली पाहिजे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मी आज जे मुद्दे मांडत आहे ते अधिक गंभीर आहेत आणि ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली.निवडणूक अधिकारी सरकारचे बाहुले बनून काम करणार असतील तर क्रिकेटमध्ये अंपायर जसे बाहेरून बोलावतात तसे निवडणूक निरीक्षकही बाहेरून बोलावण्याची वेळ आली आहे. मतदानादरम्यानचे घोळ असेच वाढले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वासच राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले. लोकशाहीची थोडी बूज असेल तर निवडणूक आयोग पालघरमधील निवडणूक प्रक्रियेची चौकशी करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.शिवसेनेने पालघरमधील जागा निसटत्या मतांनी गमावली. चार-पाच तगडे उमेदवार असल्याने भाजपाचे जमले. खरेतर, हा भाजपाचा विजयच नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, अलीकडे भाजपा ज्या पद्धतीने वागत आणि बोलत आहे त्यावरून त्यांना मित्रपक्षांची गरज राहिलेली दिसत नाही.पालघरमध्ये वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी आम्ही लढलो. निवडणुकीच्या काळात पालघरवासीयांना जी आश्वासने शिवसेनेने दिली ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहू, असेही ते म्हणाले.