शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

VIDEO : सावरघर... पाच हजार झाडांचं एक गाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:40 IST

ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे.

 - अजय जाधव

उंब्रज (सातारा) - ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. या गावात विविध प्रकारची तब्बल पाच हजार झाडे लावण्यात आली असून, ग्रामस्थांच्या एक तपापासून सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला ख-या अर्थाने फळे येऊ लागली आहेत.पाटण तालुक्यातील मुरुड येथे तारळी नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या निर्मितीसाठी शासनाने परिसरातील अनेक गावांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले. त्यापैकी क-हाड तालुक्यातील चोरे गावालगत वसवण्यात आलेले सावरघर हे एक गाव. ओसाड माळरानावर वसवले असूनही या गावातील सर्व ग्रामस्थांनी ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीप्रमाणे एकीच्या माध्यमातून हे माळरान हिरवेगारकेले आहे.आजही या गावाला पिण्याचे हक्काचे पाणी मात्र उपलब्ध नाही.  पुनर्वसन असल्यामुळे गावनिर्मितीसाठी प्लॉटची निर्मिती करताना शासनाने सर्व नियमाचे पालन केलेले आहे. यामुळे अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, मोकळी जागा, यामुळे मिळालेल्या प्लॉटवर लोकांनी घरे बांधली. रिकाम्या जागेत झाडे जगवली. या गावाचा फक्त बेचाळीस घरांचा उंबरा. या गावची लोकसंख्या सुमारे २५० च्या दरम्यान. तारळे परिसर हा डोंगराळ; पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेला भाग.  पाणीदार व झाडाझुडपांमुळे कायमचा हिरवागार. अशा निसर्गाच्या सान्निध्यात जन्मलेल्या सावरघर ग्रामस्थांना या ओसाड माळरानावर राहणे अशक्य होते; पण त्यांनी हे पुनर्वसन स्वीकारले. हेच माळरान हिरवेगार करण्याचा चंग बांधला. शासनाच्या रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतीचा पर्यावरण निधी व ग्रामस्थांनी स्वत:च्या खर्चातून गावातीलरस्त्यालगत, रिकाम्या जागेत झाडे लावण्यास सुरुवात केली.गावातील प्रत्येक घर हे नियोजन बद्धच बांधलेले आहे. घराला अंगण व परसदारी आहे. या रिकाम्या जागेत फळझाडे आणि फुलझाडे लावलेली आहेत. यामध्ये आंबा, फणस, बदाम, पेरू, चिकू, डाळिंब, अंजीर, नारळ अंजीर, सीताफळ, रामफळ अशी फळझाडे आहेत व सुगंध देणारी फुलझाडेही लावलेली आहेत. अशा खासगी मालकीच्या जागेत सुमारे दोन हजार झाडे आज बहरलेली व हिरवीगार दिसत आहेत.आता सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत; पण ऐकेकाळी भकास व उजाड माळरान असलेल्या जागेतील या गावात आता प्रवेश करताच पक्ष्यांच्या किलबिलाटानेच स्वागत होत आहे. हिरवीगार सावली मन प्रफुल्लित करत आहे. मात्र आजही हे गाव चोरे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरते. गाव हिरवेगार करणारे हे ग्रामस्थ मात्र गेली १६ वर्षे पिण्यासाठी हक्काचे पाणी मागत आहे; पण तारळी धरणाच्या पाण्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली येण्यासाठी स्वत:ची घरदार, जमीन जुमला त्याग करणा-याया गावाला आजही हक्काचे पिण्याचे पाणी नाही. केवढी ही शोकांतिका. गावातील शिवगणेश मंडळ त्याचबरोबर सुहास पाटील, जगन्नाथ पाटोळे, परशूराम सपकाळ, अंकुश सप्रे, रामदास बाबर, नवनाथ बाबर, दिनकर संकपाळ, संतोष संकपाळ, राम जाधव यांसह ग्रामस्थांची पर्यावरण संवर्धनाची ही धडपड अखंडपणे सुरूच आहे.

संवर्धनाचे एक तप पूर्णदरवर्षी ५०० हून अधिक झाडे लावायची. ती जगवायची. हे ठरवूनच झाडे लावली जाऊ लागली. झाडे लावत असताना दोन झाडांमध्ये ठराविक अंतर सोडण्यात येत होते. यामुळे ही झाडे जगलीच; पण त्यामुळे शोभाही वाढली. सलग बारा वर्षे या ग्रामस्थांनी ही झाडे लावली व जगवलेली आहेत.

अशोक, शिवर, गुलमोहर वाढवतोय शोभारस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलमोहर, रेनट्री, पाम, अशोक , शिवर, कडुनिंब, निलमोहर, निलगिरी, सप्तपर्णी अशी शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच रानटी आणि सावली देणारी झाडे ही लावलेली दिसून येत आहेत.

ठिबकने दिले पाणीया परिसरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची वानवा. त्यातच झाडांना पाणी कोठून आणायचे? हाच मोठा प्रश्न होता. परंतु यावर तोडगा काढून अनेकांनी ठिबक करून पाणी दिले. प्रत्येक ग्रामस्थ स्वत:च्या घरासमोर असणा-या झाडांच्या जगण्यासाठी धडपडत आहे. त्याला खतपाणी देत आहे. सार्वजनिक जागेतील मंदिर परिसरात लावलेल्या आंबा, नारळ यासारख्या फळझाडांना फळेही येऊ लागली आहेत.

टॅग्स :forestजंगलSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र