शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

VIDEO : सावरघर... पाच हजार झाडांचं एक गाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:40 IST

ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे.

 - अजय जाधव

उंब्रज (सातारा) - ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. या गावात विविध प्रकारची तब्बल पाच हजार झाडे लावण्यात आली असून, ग्रामस्थांच्या एक तपापासून सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला ख-या अर्थाने फळे येऊ लागली आहेत.पाटण तालुक्यातील मुरुड येथे तारळी नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या निर्मितीसाठी शासनाने परिसरातील अनेक गावांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले. त्यापैकी क-हाड तालुक्यातील चोरे गावालगत वसवण्यात आलेले सावरघर हे एक गाव. ओसाड माळरानावर वसवले असूनही या गावातील सर्व ग्रामस्थांनी ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीप्रमाणे एकीच्या माध्यमातून हे माळरान हिरवेगारकेले आहे.आजही या गावाला पिण्याचे हक्काचे पाणी मात्र उपलब्ध नाही.  पुनर्वसन असल्यामुळे गावनिर्मितीसाठी प्लॉटची निर्मिती करताना शासनाने सर्व नियमाचे पालन केलेले आहे. यामुळे अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, मोकळी जागा, यामुळे मिळालेल्या प्लॉटवर लोकांनी घरे बांधली. रिकाम्या जागेत झाडे जगवली. या गावाचा फक्त बेचाळीस घरांचा उंबरा. या गावची लोकसंख्या सुमारे २५० च्या दरम्यान. तारळे परिसर हा डोंगराळ; पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेला भाग.  पाणीदार व झाडाझुडपांमुळे कायमचा हिरवागार. अशा निसर्गाच्या सान्निध्यात जन्मलेल्या सावरघर ग्रामस्थांना या ओसाड माळरानावर राहणे अशक्य होते; पण त्यांनी हे पुनर्वसन स्वीकारले. हेच माळरान हिरवेगार करण्याचा चंग बांधला. शासनाच्या रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतीचा पर्यावरण निधी व ग्रामस्थांनी स्वत:च्या खर्चातून गावातीलरस्त्यालगत, रिकाम्या जागेत झाडे लावण्यास सुरुवात केली.गावातील प्रत्येक घर हे नियोजन बद्धच बांधलेले आहे. घराला अंगण व परसदारी आहे. या रिकाम्या जागेत फळझाडे आणि फुलझाडे लावलेली आहेत. यामध्ये आंबा, फणस, बदाम, पेरू, चिकू, डाळिंब, अंजीर, नारळ अंजीर, सीताफळ, रामफळ अशी फळझाडे आहेत व सुगंध देणारी फुलझाडेही लावलेली आहेत. अशा खासगी मालकीच्या जागेत सुमारे दोन हजार झाडे आज बहरलेली व हिरवीगार दिसत आहेत.आता सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत; पण ऐकेकाळी भकास व उजाड माळरान असलेल्या जागेतील या गावात आता प्रवेश करताच पक्ष्यांच्या किलबिलाटानेच स्वागत होत आहे. हिरवीगार सावली मन प्रफुल्लित करत आहे. मात्र आजही हे गाव चोरे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरते. गाव हिरवेगार करणारे हे ग्रामस्थ मात्र गेली १६ वर्षे पिण्यासाठी हक्काचे पाणी मागत आहे; पण तारळी धरणाच्या पाण्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली येण्यासाठी स्वत:ची घरदार, जमीन जुमला त्याग करणा-याया गावाला आजही हक्काचे पिण्याचे पाणी नाही. केवढी ही शोकांतिका. गावातील शिवगणेश मंडळ त्याचबरोबर सुहास पाटील, जगन्नाथ पाटोळे, परशूराम सपकाळ, अंकुश सप्रे, रामदास बाबर, नवनाथ बाबर, दिनकर संकपाळ, संतोष संकपाळ, राम जाधव यांसह ग्रामस्थांची पर्यावरण संवर्धनाची ही धडपड अखंडपणे सुरूच आहे.

संवर्धनाचे एक तप पूर्णदरवर्षी ५०० हून अधिक झाडे लावायची. ती जगवायची. हे ठरवूनच झाडे लावली जाऊ लागली. झाडे लावत असताना दोन झाडांमध्ये ठराविक अंतर सोडण्यात येत होते. यामुळे ही झाडे जगलीच; पण त्यामुळे शोभाही वाढली. सलग बारा वर्षे या ग्रामस्थांनी ही झाडे लावली व जगवलेली आहेत.

अशोक, शिवर, गुलमोहर वाढवतोय शोभारस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलमोहर, रेनट्री, पाम, अशोक , शिवर, कडुनिंब, निलमोहर, निलगिरी, सप्तपर्णी अशी शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच रानटी आणि सावली देणारी झाडे ही लावलेली दिसून येत आहेत.

ठिबकने दिले पाणीया परिसरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची वानवा. त्यातच झाडांना पाणी कोठून आणायचे? हाच मोठा प्रश्न होता. परंतु यावर तोडगा काढून अनेकांनी ठिबक करून पाणी दिले. प्रत्येक ग्रामस्थ स्वत:च्या घरासमोर असणा-या झाडांच्या जगण्यासाठी धडपडत आहे. त्याला खतपाणी देत आहे. सार्वजनिक जागेतील मंदिर परिसरात लावलेल्या आंबा, नारळ यासारख्या फळझाडांना फळेही येऊ लागली आहेत.

टॅग्स :forestजंगलSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र