शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘आंतरिक’ शक्ती ओळखा : रविना टंडन

By admin | Updated: December 5, 2014 11:06 IST

भारतीय महिलांमध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा, असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला.

पुणे : भारतीय महिलांमध्ये सर्व गोष्टी करण्याची अफाट क्षमता आहे. नोकरी करीत असूनही कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी त्या उत्कृष्टपणे सांभाळतात. त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे ती जगातील कुठल्याही महिलेमध्ये पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपल्यातील ‘आंतरिक’ शक्तीला ओळखा, असा मूलमंत्र प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने महिलांना दिला. कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्ससारख्या भारतीय वंशाच्या महिलांनी अंतराळाला गवसणी घातली, हे एक भारतीय महिलाच करू शकली, तुम्हीदेखील स्वत:चे वेगळेपण सिद्ध करू शकता, अशी भावना तिने महिलांच्या मनात चेतविली. रविना म्हणाली, ‘‘तुम्ही स्वत: आई होणार आहात, मग आपल्या तान्हुल्याचा जीव घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्यांना देऊच कशा शकता. अशा महिलांमुळे कुटुंबाची चव बिघडू शकते. आपल्या मुलांवर कशा प्रकारचे संस्कार करीत आहात, हेही लक्षात घेतले पाहिजे. महिलांचा सन्मान करण्याची बीजं लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजली गेली पाहिजेत.’’अखियोंसे गोली मारे...रवीना टंडन यांना डोळ्याचे इन्फेक्शन असूनही ‘वुमेन समिट’मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘ गॉगल हा काही माझा फॅशन सिम्बॉल नाही तर माझ्यामुळे कोणाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून घातला आहे. नाहीतर ‘अखियोंसे गोली मारे... असं व्हायचं. ...तर त्याला महिलाही तितक्याच ‘दोषी’‘स्त्री’ ही कुटुंबाचे बलस्थान आहे. एकाच वेळी ती घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत ताकदीने निभावू शकते; पण कुटुंबाची तिला साथ मिळणे आवश्यक आहे. आजही स्त्रीभ्रूणहत्या किंवा हुंडाबळीसारख्या घटना घडत आहेत, मात्र यामध्ये कुटुंबातील महिलाही तितकीच जबाबदार आहे. घरात जर अशी कृत्ये होत असतील तर त्याला महिलाही तितक्याच ‘दोषी’ आहेत. महिलांनी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. शांत राहून डोळ्यांसमोर अन्याय होत असलेला पाहणे हादेखील एक गुन्हाच आहे. --------------चॅलेंज स्वीकारलं आणि यशस्वी झाले : उषा काकडे या वेळी संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा उषा काकडे यांच्याशी संवाद साधला. आपल्या व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीचे गमक काय, असे विचारले असता काकडे म्हणाल्या, ‘‘कुठलाही व्यवसाय वाढला की घरातील मंडळींची मदत लागतेच. तशी माझीही मदत मागितली गेली. शिक्षण कमी होते तरीही चॅलेंज म्हणून जबाबदारी स्वीकारली. स्टाफला बरोबर घेऊन व्यवसायातील खाचा-खोचा जाणून घेतल्या. छोट्या-छोट्या गोष्टीतून शिकत गेले. १२ वर्षे झाली, २२ कंपन्यांचे अकाउंट्स सांभाळत आहे.’’