शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रामदास कदम - शेट्टी यांच्यात तू तू मैं मैं

By admin | Updated: September 25, 2014 09:19 IST

महायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.

संदीप प्रधान, मुंबईमहायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील एका हॉटेलात सेनेचे नेते दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई व संजय राऊत हे नियोजित वेळी पोहोचले. मात्र भाजपाच्या किंवा मित्रपक्षांच्या नेत्यांचा पत्ता नव्हता. अर्ध्या तासानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे दाखल झाले. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर ओम माथूर बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. यामुळे अगोदरच शिवसेना नेते अस्वस्थ झाले होते. सध्या शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये एकमेकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची अहमहमिका लागलेली आहे.बैठक सुरू होताच केवळ सात जागा मिळत असल्याने स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या संतापाचा कडेलोट झाला. तुम्ही आम्हाला काय भिकारी समजता का? आम्ही तुमच्याकडे कटोरा घेऊन आलो नाही. दोन महिने आपली चर्चा सुरू आहे ती केवळ सात जागा देऊ करण्याकरिता का? शेट्टी यांचा आवाज चढल्याने शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पित्त खवळले. तोंड संभाळून बोला. इतके टोकाचे बोलायचे असेल तर चर्चा कशाला करायची? तुमची भाषा बरोबर नाही, अशा शब्दांत कदम यांनी शेट्टींचा समाचार घेतला. लागलीच शेट्टी उठले आणि तरातरा लिफ्टकडे निघाले. त्यांच्यापाठोपाठ विनोद तावडे व आशिष शेलार धावत गेले. त्यांनी त्यांना विनंती करून हाताला धरून परत आणले. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना तुम्ही चार जागा दिल्या. त्या तर्कशास्त्रानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सहा यानुसार किमान २४ विधानसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी बैठकीत केली गेली. रिपाइंचे रामदास आठवले हे भोजनाला न थांबताच निघून गेले.