शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 10:29 IST

Ramdas Athawale Interview Rajkarnachya Palikade: लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या.

माझं मन कवितेत, गावात, दिल्लीत असते. या देशातील गरीब माणसाला न्याय देण्यासाठी माझे मन असते. माझ्याकडे पाहिले तर लोकांना वाटते की हा नेता नाही. नरेंद्र मोदींना हसविणे सहजासहजी कोणाला जमलेले नाही. ते मी केले, असे सांगतानात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी त्यांनी त्याच्या आईने केलेले अपार कष्ट देखील नमूद केले. (Ramdas Athawale Interview  by Lokmat. telling mother's sacrifices.)

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या. माझी आई शेतमजूर म्हणून काम करायची. मी सहा महिन्यांचा असताना वडील नायगावमध्ये कामगार होते. लहानपणीच त्यांचे छत्र हरपले. त्यामुळे आजोळी मी वाढलो, शिकलो. तेथील शाळेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत झालो. आई माझ्यासाठी शेतात राब राब राबली. आईने मला शिकविले नसते तर मी आज इथे पोहोचू शकलो नसतो. गूळ, आंबे मला खूप आवडायचे. पाटलाच्या शेतातून दोन-तीन ऊस तोडून आणायची. हॉस्टेलला असताना आई दररोज एसटीतून डबा पाठवायची. बस स्टॉपवर जाऊन तो डबा घ्यायचो. सकाळी उठून ती डबा बनवायची, अशा आठवणी आठवलेंनी जागवल्या. यावेळी ते काहीसे भावूक देखील झाले.  

बाबासाहेबांची चळवळ ही दलित आणि सवर्णांना वेगळे करणारी नव्हती, तर ती एकत्र आणणारी होती, असे आठवले म्हणाले. 

माझे मुंबईत घर नव्हते...शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना मला राज्यात मंत्री केले. तेव्हा मी सातपुडा बंगल्यावर आलो. सत्ता गेल्यानंतर मला मुंबईत रहायला घर नव्हते. 6000 रुपये भाडे देवून मी दुसरीकडे राहत होतो. मंत्री असताना मला एक जमीन मिळाली होती. तिथे मी घर बांधले आणि 2011 मध्ये तिथे रहायला गेलो, अशी आठवण रामदास आठवलेंनी सांगितली.  

भाजपाकडे कसा वळलो...शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले. मग मी राज्यभरातील लोकांशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरेंची बाजू मांडली. ठाकरेंबाबत कश्या अफवा पसरविल्या असे त्यांना सांगितले. त्यानंतर राजकारणात असे होऊ शकते, असा निर्णय घेऊन आम्ही युतीत आलो. आता भाजपासोबत आहे, असा खुलासा रामदास आठवलेंनी केला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे