शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सहा एकर जमिनीवर पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे होणार संकलन!

By admin | Updated: January 1, 2017 01:27 IST

श्री अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थानचा उपक्रम; पाण्याचे शुद्धीकरण करून केल्या जाईल उपयोग

अरविंद गाभणे मालेगाव (जि. वाशिम), दि. ३१- जैन समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शिरपूर जैन येथील अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थानच्यावतीने सहा एकर जागेमध्ये परसबाग उभारण्यात येत आहे. या परसबागेत पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे संकलन केल्या जाणार आहे. तसेच संकलित करण्यात आलेल्या पाण्याच्या उपयोगाचेही नियोजन करण्यात आले आहे. श्‍वेतांबर जैन मुनीश्री पन्न्यासप्रवर विमलहंस विजयजी महाराज व पन्न्यासप्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात श्री. अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थानमध्ये बर्‍याच दिवसांपासून या परसबागेचे कार्य जोमाने चालू आहे. हजारो कामगारांच्या हस्ते परसबाग साकारल्या जात आहे. परसबागेमध्ये भक्तनिवास संकुल, प्रसादालयासह विविध बांधकाम सुरू आहेत. या परिसरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, याकरिता व्यवस्था केली आहे. जमिनीवर फरशी, टाइल्स बसविल्या असून, त्याचा उतार काढण्यात आला आहे. उताराच्या बाजूला नाल्या करण्यात आल्यात यामुळे पावसाचे पाणी परसबागेतील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाणार आहे. हे पाणी या नालीच्या लगत असलेल्या झाडांना ड्रिपरच्या पाइपने सोडलेले आहे. झाडाला जर पाणी जास्त होत असेल, तर त्या पाइपांना बूच लावून बंद केल्यानंतर नालीतून जल संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी जाईल. जल संकलनासाठी दोन फूट रुंद व तीन फूट खोल व पाच हजार फूट लांब पक्की नाली बांधण्यात आली आहे. नालीच्या तळाला बेड टाकण्यात आले नाही. नालीत दगड टाकून ती भरण्यात आली आहे. यामुळे या नालीत पडणारे पाणी जमिनीत झिरपेल. तरीही पाण्याचे प्रमाण जास्त झाले, तर ते संकलित करण्यासाठी ४0 फूट आकाराचा व १५ फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये दगड व गिट्टी टाकण्यात येत आहे. यात साठलेले पाणी येथे बांधण्यात येत असलेल्या जलमंदिरात घेण्यात येणार आहे. तसेच भक्तिनिवासात असलेल्या स्नानगृहातही हे पाणी शुद्ध करून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.     पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब वाहून न जाता तो भूगर्भात गेला पाहिजे, याकरिता हा वर्षाजल संकलनाचा उपक्रम राबविला आहे. विदर्भातील हा एकमव उपक्रम असावा, असे वाटते.- दिनेश मुथा,व्यवस्थापक, श्री. अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थान, शिरपूर.  या वर्षाजल संकलनामुळे परसबागेजवळील विहिरी व कुपनलिका यांच्या भूजल पातळीत वाढ होणार आहे. जैन संस्थानने केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. - विनायकराव देशमुख,कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नेहरू ब्रिगेड, वाशिम.