शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:36 IST

जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली..

ठळक मुद्देमध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे विस्कळीत

पुणे : पावसाळा सुरू झाला की मुंबईत रेल्वेमार्गावर साठणारे पाणी आणि कर्जत-लोणावळादरम्यान घाटात दरडी कोसळण्याची नेहमीच भीती असते. त्यामुळे दरवर्षी या काळात अधुन-मधून रेल्वेसेवा विस्कळीत होते. पण यंदाचा पावसाळा आतापर्यंत रेल्वेची झोप उडविणारा ठरला आहे. जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याबरोबरच अंशत: रद्द, मार्गात बदल करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात २९ व ३० तारखेला मुंबईतील धुवांधार पाऊस झाला. या पावसाने मुंबईतील रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली होती. काही गाड्या रद्द करण्याबरोबरच विलंबानेही धावत होत्या. तेव्हापासून रेल्वेच्या परीक्षेचा काळ सुरू झाला. लगेच पुढचे चार दिवस पुणे-मुंबईदरम्यानच्या सेवेवर विपरीत परिणाम झाला. १ जुलै रोजी जामरूंग ते ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मुंबईतून पुण्याकडे गहू घेऊन येणारी मालगाडी घसरली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही शहरादरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर पुढील दोन दिवस सिंहगड व प्रगती एक्सप्रेस रद्द केली. लांबपल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. त्यानंतर ८ जुलैला ठाकुरवाडी आणि मंकीहिलदरम्यान मोठी दरड कोसळली. तब्बल दोन मीटर लांबीचे दगड रेल्वेमार्गावर आले होते. दुपारी ३.२० वाजता ही दरड कोसळली होती. त्यानंतर दुसºया दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या दरम्यानच्या सर्व गाड्या तीन ते चार तास विलंबाने धावल्या.पावसाने पुढील १५ दिवस काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आधीच्या मुसळधार पावसामुळे या काळात घाटा क्षेत्रात मोठे दगड, माती रेल्वेमार्गावर येण्याच्या घटना अधूनमधून घडतच होत्या. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घाट क्षेत्रात ठाण मांडून होते. पावसात पुन्हा दरडी कोसळू नयेत म्हणून रेल्वेने घाट क्षेत्रात विविध उपाययोजना करण्यासाठी २६ जुलै ते ९ आॅगस्ट या दरम्यान प्रगती, डेक्कन एक्सप्रेस, पुणे-पनवेल पॅसेंजरसह लांबपल्याच्या काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. पण २६ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत पावसाने रेल्वेची अक्षरश: झोप उडविली.  ...जुलैपासून सतत रेल्वेसेवा राहिली विस्कळीत

२७ जुलैला अंबरनाथ, बदलापुर, वांगणी येथे उल्हास नदीला आलेल्या पुराने रेल्वेमार्गाला वेढा घातला. या पुरात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती. गाडीला प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढताना सर्वच यंत्रणांचे धाबे दणाणले होते. या पावसाने मुंबई-पुणे दरम्यानच्या काही गाड्याही रद्द कराव्या लागल्या. ३० जुलैला पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली. तर ३ आॅगस्टला रात्री मकी हिलजवळ मोठी दरड कोसळल्याने तसेच रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाल्याने स्वातंत्र्यदिनापर्यंत एकही गाडी पुणे-मुंबईदरम्यान धावली नाही. रेल्वेसाठी हा काळ खुप कठीण होता. मागील दिवस या मार्गावर गाड्या धावत आहेत. पण पावसाळा अजून संपलेला नाही, त्यामुळे रेल्वेला ‘परीक्षे’साठी सतत दक्ष राहावे लागणार आहे.असा झाला रेल्वेचा खोळंबा- दि. २९, ३० जून - मुंबईत पावसाने गाड्यांना विलंब- दि १ ते ४ जुलै - ठाकुरवाडी-जामरूंग स्थानकादरम्यान मालगाडी घसरली, रेल्वे ठप्प- दि. ८ जुलै - ठाकुरवाडी आणि मंकीहिलदरम्यान दरड कोसळली, १४ तास वाहतुक विस्कळीत- दि. २६ जुलै ते ९ ऑगस्ट - उपाययोजनांसाठी काम हाती घेतल्याने काही गाड्या रद्द- दि. २७ ते २९ जुलै - मुसळधार पावसाने मुंबई विभागातील रेल्वेमार्ग पाण्याखाली. महालक्ष्मी पुरात अडकली, काही गाड्या रद्द- ३० जुलै - पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली- दि. ३ ते १५ ऑगस्ट- ३ ऑगस्टला रात्री मंकीहिलजवळ दरड कोसळली. पुढील बारा दिवस रेल्वे ठप्प

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेRainपाऊस