शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:36 IST

जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली..

ठळक मुद्देमध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे विस्कळीत

पुणे : पावसाळा सुरू झाला की मुंबईत रेल्वेमार्गावर साठणारे पाणी आणि कर्जत-लोणावळादरम्यान घाटात दरडी कोसळण्याची नेहमीच भीती असते. त्यामुळे दरवर्षी या काळात अधुन-मधून रेल्वेसेवा विस्कळीत होते. पण यंदाचा पावसाळा आतापर्यंत रेल्वेची झोप उडविणारा ठरला आहे. जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याबरोबरच अंशत: रद्द, मार्गात बदल करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात २९ व ३० तारखेला मुंबईतील धुवांधार पाऊस झाला. या पावसाने मुंबईतील रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली होती. काही गाड्या रद्द करण्याबरोबरच विलंबानेही धावत होत्या. तेव्हापासून रेल्वेच्या परीक्षेचा काळ सुरू झाला. लगेच पुढचे चार दिवस पुणे-मुंबईदरम्यानच्या सेवेवर विपरीत परिणाम झाला. १ जुलै रोजी जामरूंग ते ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मुंबईतून पुण्याकडे गहू घेऊन येणारी मालगाडी घसरली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही शहरादरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर पुढील दोन दिवस सिंहगड व प्रगती एक्सप्रेस रद्द केली. लांबपल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. त्यानंतर ८ जुलैला ठाकुरवाडी आणि मंकीहिलदरम्यान मोठी दरड कोसळली. तब्बल दोन मीटर लांबीचे दगड रेल्वेमार्गावर आले होते. दुपारी ३.२० वाजता ही दरड कोसळली होती. त्यानंतर दुसºया दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या दरम्यानच्या सर्व गाड्या तीन ते चार तास विलंबाने धावल्या.पावसाने पुढील १५ दिवस काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आधीच्या मुसळधार पावसामुळे या काळात घाटा क्षेत्रात मोठे दगड, माती रेल्वेमार्गावर येण्याच्या घटना अधूनमधून घडतच होत्या. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घाट क्षेत्रात ठाण मांडून होते. पावसात पुन्हा दरडी कोसळू नयेत म्हणून रेल्वेने घाट क्षेत्रात विविध उपाययोजना करण्यासाठी २६ जुलै ते ९ आॅगस्ट या दरम्यान प्रगती, डेक्कन एक्सप्रेस, पुणे-पनवेल पॅसेंजरसह लांबपल्याच्या काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. पण २६ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत पावसाने रेल्वेची अक्षरश: झोप उडविली.  ...जुलैपासून सतत रेल्वेसेवा राहिली विस्कळीत

२७ जुलैला अंबरनाथ, बदलापुर, वांगणी येथे उल्हास नदीला आलेल्या पुराने रेल्वेमार्गाला वेढा घातला. या पुरात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती. गाडीला प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढताना सर्वच यंत्रणांचे धाबे दणाणले होते. या पावसाने मुंबई-पुणे दरम्यानच्या काही गाड्याही रद्द कराव्या लागल्या. ३० जुलैला पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली. तर ३ आॅगस्टला रात्री मकी हिलजवळ मोठी दरड कोसळल्याने तसेच रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाल्याने स्वातंत्र्यदिनापर्यंत एकही गाडी पुणे-मुंबईदरम्यान धावली नाही. रेल्वेसाठी हा काळ खुप कठीण होता. मागील दिवस या मार्गावर गाड्या धावत आहेत. पण पावसाळा अजून संपलेला नाही, त्यामुळे रेल्वेला ‘परीक्षे’साठी सतत दक्ष राहावे लागणार आहे.असा झाला रेल्वेचा खोळंबा- दि. २९, ३० जून - मुंबईत पावसाने गाड्यांना विलंब- दि १ ते ४ जुलै - ठाकुरवाडी-जामरूंग स्थानकादरम्यान मालगाडी घसरली, रेल्वे ठप्प- दि. ८ जुलै - ठाकुरवाडी आणि मंकीहिलदरम्यान दरड कोसळली, १४ तास वाहतुक विस्कळीत- दि. २६ जुलै ते ९ ऑगस्ट - उपाययोजनांसाठी काम हाती घेतल्याने काही गाड्या रद्द- दि. २७ ते २९ जुलै - मुसळधार पावसाने मुंबई विभागातील रेल्वेमार्ग पाण्याखाली. महालक्ष्मी पुरात अडकली, काही गाड्या रद्द- ३० जुलै - पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली- दि. ३ ते १५ ऑगस्ट- ३ ऑगस्टला रात्री मंकीहिलजवळ दरड कोसळली. पुढील बारा दिवस रेल्वे ठप्प

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेRainपाऊस