शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांचा खरेदी कर झाला माफ

By admin | Updated: November 21, 2014 02:31 IST

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी ८०० कोटी रुपयांचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. क

मुंबई : आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी ८०० कोटी रुपयांचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. करमाफीची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण केली जाईल, अशी घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.रंगराजन समितीने केलेल्या शिफारशीनुसार ऊसाला एफआरपी देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. त्याचवेळी साखरेचे दर कोसळत असल्याने कारखाने अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने करमाफीचा दिलासा दिला. ही सवलत दिल्यानंतर जे कारखाने एफआरपीनुसार २४०० ते २६०० रुपये टनाचा भाव देणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पाटील यांनी दिला. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने अशाच पद्धतीने अडचणीत असताना केंद्र सरकारने २१०० कोटी रुपयांची मदत दिलेली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कारखान्यांनाही मदत द्यावी, असे साकडे केंद्र सरकारला घालण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांची आपण लवकरच भेट घेऊ, असे पाटील म्हणाले. कारखान्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून मळी नियंत्रणमुक्त केली आहे. कारखाने इतर राज्यांमध्येही मळीची विक्री करु शकतात, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ राज्यातील १७ लाख ऊसतोड कामगरांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल. या महामंडळाला साखर कारखाने आणि राज्य शासन भांडवल देईल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)