शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:52 IST

लोकल गाड्यांमध्ये काही स्थानकांवर गाडी थांबणार नाही, अशी माहिती दर्शवणारे फलक किंवा घोषणा असतात. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे फलक किंवा घोषणा प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'वंदे भारत' गाड्यांप्रमाणे सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षा सूचना (अनाउन्समेंट) सुरू करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला दिला. गाडी कोणत्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे, याची माहिती देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले.

प्रवाशांनी चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे, असे न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निकालात म्हटले आहे. जवळपास १० वर्षापूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या एका व्यक्तीस न्यायालयाने ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

लोकल गाड्यांमध्ये काही स्थानकांवर गाडी थांबणार नाही, अशी माहिती दर्शवणारे फलक किंवा घोषणा असतात. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे फलक किंवा घोषणा प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत. अनेक प्रवासी या गाड्यांचा वापर कमी अंतराच्या प्रवासासाठीही करतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार नाही, याबाबत कोणतीही घोषणा नसल्यास, अशा स्थानकांवर चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या प्रवाशांना दोष देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रवाशांनी चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे. गाडी पुढील स्थानकावर थांबेपर्यंत प्रतीक्षा करावी आणि आवश्यक असल्यास दंड भरावा, असा सल्ला न्यायालयाने दिला.

... म्हणून एखादा जीव धोक्यात घालतो

आपल्याला उतरायचे आहे, त्या स्थानकावर ट्रेन थांबणार नाही, हे समजल्यावर त्या क्षणी एखादी व्यक्ती जीव धोक्यात घालणारा निर्णय घेऊ शकते, याची मला जाणीव आहे; पण अशा वेळी मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. हे प्रवाशांच्या कुटुंबाच्या हितासाठी आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. 'अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वंदे भारत गाड्यांप्रमाणे सर्व गाड्यांमध्ये सार्वजनिक घोषणा प्रणाली सुरू करावी,' असे न्यायालयाने सुचविले.

न्यायालयाचे निरीक्षण काय ?

रोहिदास कुमावत यांनी दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी सुरू होती. रेल्वे दावा न्यायाधिकरणाने त्यांचा भरपाईचा दावा फेटाळला होता. न्यायाधिकरणाने ही घटना अपघात नसून रोहिदास यांच्या चुकीमुळे ते जखमी झाल्याचे म्हटले होते. याचिकेनुसार, कुमावत हे मनमाड ते जळगावदरम्यान गुवाहाटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. जळगाव स्थानकाजवळ गाडी येत असताना गर्दीमुळे त्यांचा हात निसटला आणि ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला व पायांना दुखापत झाली.

...तर दुखापत होणे स्वाभाविक

रोहिदास कुमावत हे प्रामाणिक प्रवासी होते आणि जळगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्थानक असल्याने सर्व गाड्या तिथे थांबतात, असा त्यांचा समज होता. गाडी जळगावला थांबत नाही, हे लक्षात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला, तर दुखापत होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत न्यायालयाने कुमावत यांना ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई १२ आठवड्यांत देण्याचे रेल्वे प्रशासनाला आदेश दिले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : High Court advises safety announcements like Vande Bharat in all trains.

Web Summary : Mumbai High Court advises railways to implement safety announcements like Vande Bharat in all long-distance trains, including station information. Court ordered compensation for a passenger injured while disembarking a moving train, emphasizing passenger safety and awareness.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेHigh Courtउच्च न्यायालयVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस