शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यवर्धित शेतीसाठी प्रोत्साहन

By admin | Updated: September 23, 2014 04:49 IST

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी

अकोला : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत राज्यात मनुष्यबळ विकासावर भर देण्यात येत असून, फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धीत शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत पश्चिम विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेवून, विविध प्रक्रिया उद्योगही सुरू केले आहेत.मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत कृषी व फळकाढणी पश्चात प्रशिक्षणाचे ४७ भाग तयार केले आहेत. कौशल्य वृद्धीच्या या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य घेतले जात आहे. तीन ते सात दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी २० प्रशिक्षणार्थींच्या एका बॅचकरीता या प्रकल्पातंर्गत ५० हजार रू पयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यात दहा हजार ग्रामीण महिला, युवक व शेतकरी गटांच्या सदस्यांमधून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात पाचशेच्यावर शेतकऱ्यांना असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सोयाबीनपासून विविध प्रक्रिया उत्पादनांची निर्मीती आणि विक्री, मक्यावर आधारित लघू उद्योग, लिंबूवर्गीय फळ पिकांची काढणी व पश्चात व्यवस्थापन, कापूस पिकाची वेचणी व काढणीनंतरच्या विविध कामांचे व्यवस्थापन, लिंबूवर्गीय फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग, डाळ गिरणी व डाळीच्या पिठाची गीरणी,भात प्रक्रिया उद्योग, परदेशी भाजीपाला उत्पादन आणि विक्री, व्यावसायिकदृष्ट्या दुर्लक्षित फळांचे प्रक्रियेच्या माध्यमातून मूल्यवर्धन, चटणी, लोणची गृह उद्योग, फळे भाजीपाला सुकवून हवाबंद डब्यात साठविणे तसेच गोठविण्याचा व्यवसाय, पारंपारिक मसाला पिकांची काढणी, हाताळणी साठवण व विक्री व्यवस्था, आंबा प्रकिया उद्योग, ऊसापासून रस, गुळ आणि काकवीचे उत्पादन व विक्री, केळी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, दुध प्रक्रिया उद्योग, टोमॅटो, बटाटा व मिरची प्रक्रिया उद्योग, पुष्परचना आणि पुष्प सजावट व्यवसाय, काजू प्रक्रिया उद्योग, शेतमालाची सुरक्षित वाहतूक व्यवस्था आदीचे प्रशिक्षण शेतकरी, बचत गटांना देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)