शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देणार

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल

नागपूर : राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. अनिल सोले व नागो गाणार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन बांबू धोरण जाहीर करण्यात आले आहे. खाजगी जमिनीवरील बांबूस वाहतूक पासच्या बंधनातून मुक्त करणे, बांबू क्षेत्रातील उद्योजकांना ई-लिलाव पद्धतीने पारदर्शकरीत्या बांबू पुरवठा करणे तसेच बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे यांचा समावेश असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.ठाणे, पालघर जिल्ह्यात तीन महिन्यात १५६ बालमृत्यूएप्रिल ते जून २०१४ या कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये १५६ बालमृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.हे सर्व बालमृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत तीव्र कमी वजनाची १३ हजार ५१४, मध्यम कमी वजनाची ५६ हजार ७४६ बालके आढळून आली होती. परंतु आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कामकाजामुळे त्यांना कुपोषित म्हणता येणार नसल्याचे या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.वनक्षेत्रांवरील अतिक्रमण तीन महिन्यात हटविणारऔरंगाबाद वनविभागांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण येत्या तीन महिन्यात हटविण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जयंत पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एप्रिल २०१४ अखेर असलेल्या १०७ हेक्टर ३३ आर वनक्षेत्रातील अतिक्रमणापैकी ६१.१८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. सतेच ११.५० हेक्टर अतिक्रमित क्षेत्राची दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित २६.६५ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरू असून येत्या तीन महिन्यात ही अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्यात येतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.तिवरांच्या जंगलांवर बेकायदा भरावमुंबईतील मालाड येथील मार्वे समुद्रकिनाऱ्याजवळील टॅबच्या पार्किंगशेजारी असलेल्या तिवरांच्या जंगलात बेकायदा भराव टाकून घरे बांधण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या क्षेत्रावर भरावापूर्वी तिवराचे जंगल असल्याचे गुगल इमेजवरून लक्षात आले. यासंदर्भात पश्चिम मुंबईच्या वनक्षेत्रपालांनी बोरीवलीच्या तहसीलदारांना अहवाल पाठवला असू यावर नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)