शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा परिषदांकडून अनुकंपा भरतीला खो!

By admin | Updated: September 30, 2015 00:56 IST

शासनाने १0 टक्के जागा भरण्यास २0१४ मध्येच दिली मंजुरी; मात्र जिल्हा परिषदांकडून अद्याप प्रतिसाद नसल्याने हजारो पात्रताधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत.

अकोला: राज्यातील जिल्हा परिषदांकडून अनुकंपा तत्त्वावरील पदभरतीला खो देण्यात आल्यामुळे २0१४ मध्ये राज्य शासनाने रिक्त पदांच्या १0 टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यास मंजुरी देऊनही हजारो पात्रताधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागासह जिल्हा परिषदेत कार्यरत वर्ग ह्यकह्ण आणि ह्यडह्ण मधील दरवर्षी रिक्त होणार्‍या एकूण पदांपैकी १0 टक्के पदे सन २0१२ च्या भरती वर्षापासून अनुकंपा तत्त्वावर भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. तसा आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १ मार्च २0१४ रोजी दिला होता. या आदेशान्वये अनुकंपा तत्त्वावरील पदे ५ टक्केऐवजी १0 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच २ मे २0१४ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पूरक आदेश काढून भरती प्रक्रिया २0१२ पासून करण्याबाबत स्पष्ट केले होते. हा निर्णय राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनासुद्धा लागू असल्याबाबतची माहिती सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना ९ एप्रिल २0१४ मध्येच देण्यात आली. त्यानंतरही राज्यात जिल्हा परिषदांमध्ये रिक्त होणार्‍या एकूण पदांपैकी १0 टक्के जागा अनुकंपा तत्त्वानुसार भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा आदेश गांभीर्याने न घेतल्यामुळे २0१२ पासून अकोला जिल्ह्यातच शंभरपेक्षा अधिक अनुकंपा तत्त्वावरील पात्र उमेदवार प्रतीक्षेत आहेत. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये असून, त्याकडे भाजपचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष गजानन भटकर यांनी राज्य शासनाचे डिसेंबर २0१४ मध्येच लक्ष वेधले होते. त्यांच्या पत्रानुसार ३0 मार्च २0१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने अकोला जिल्हा परिषदेसह सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अनुकंपा तत्त्वावरील पदे भरतीबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत विचारणा केली आहे.

२00५ पासून पदभरती बंद!

राज्यातील जिल्हा परिषदांकडून अनुकंपा तत्त्वावरील पदभरती २00५ पासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील अर्धेअधिक पात्र उमेदवारांनी वेळेत नियुक्ती न मिळाल्याने वयोर्मयादा ओलांडली आहे. शासनाच्या मान्यतेनंतरही स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडून नियुक्तीबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे पात्र उमेदवारांना वेळेत नियुक्ती मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे.