शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:41 IST

विक्रोळीतील वर्षानगरमधील नागरिक त्रस्त : १५ मिनिटांच्या पाण्यासाठी १०० रूपये

मुंबई : अवघ्या १५ मिनिटाच्या पाण्यासाठी १०० रुपये मोजायचे. आणि पाण्याच्या प्रतीक्षेत रात्र काढायची. पाण्याने भरलेले हंडे, बादल्या कडेवर घेत निसरड्या वाटेतून घर गाठायचा. पाण्यासाठीचा असा जीवघेणा खेळ विक्रोळीच्या वर्षानगर परिसरात सुरु आहे.विक्रोळी पश्चिमेकडील सुर्यानगर, शिवाजी नगर, रायगड झोन वर्षा नगर परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहेत. यात, डोंगरात वसलेल्या वर्षा नगर परिसरात ८ ते १० हजार रहिवासी पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. या परिसरात पाण्याची टाकी उभारली. मात्र याची देखरेख खासगी मंडळाकडून होते. त्यात येथील रहिवाशांनाकडून १५ मिनिटाच्या पाण्यासाठी महिनाकाठी १०० रुपये आकारण्यात येत आहे.

सायंकाळी साडे सात वाजल्यापासून येथील विविध प्रभागांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यातही टेकडीवर असलेल्यांना पाण्यासाठी तळाशी असलेल्या नळावर रांगा लावाव्या लागतात. ३० मिनिटाची वेळ असली तरी, फक्त १५ ते २० मिनिटे पाणी रहिवाशांच्या नशीबी पडते. ते घेण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. त्यामुळे अनेकदा ’कोणी पाणी देत का पाणी म्हणत’ ही मंडळी पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या नळाकडील रहिवांशाकडे विनवणी करताना दिसतात. एका नळावर अनेकदा १५ ते २० कुटुंब रांग लावून असतात.अशात, अनधिकतपणे नळजोडणी वाढल्याने, येथील पाण्याचा दबाव आणखीन कमी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यावर पाणी सांडल्याने रस्ताही निसरडा होतो. त्यामुळे अपघाताच्याही छोट्या मोठ्या घटना येथील रहिवाशांसाठी नवीन नाही.पाण्यासाठीच मरण...पाण्यासाठीची वेळ ठरलेली. त्यातही कमी दाबामुळे एक हंडा भरण्यासाठी ४ ते ५ मिनिटे लागतात. त्यात, एका नळावर दोन कुटुंबे अवलंबून असली तरी, वरच्या रहिवाशांचीही त्याच ठिकाणी गर्दी असते. त्यामुळे आमच मरण हे नेहमीच बनले आहे. अशा अवस्थेत कोणीही मदतीला फिरकत नाही. नुकताच याच समस्येमुळे दुसरीकडे भाड्याने राहतो आहे.- मनोज पांडे, स्थानिक रहिवासीकमी वेळ, त्यात कमी दाब यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च कनेक्शन मिळते. कनेक्शन मिळाले की सुरुवातीचे १५ दिवस पाणी येणार व्यवस्थित, मात्र नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. त्यात, अनधिकत पाणी धारकांना ७० ते ७५ हजार रुपयांत जोडणी मिळते. जे अधिकत आहेत. त्यांच्याच नळाच्या पाईपमध्ये टब मारुन त्यांना पाणी दिले जाते.- रवी तिवारी, शिवाजी नगर रहिवासीमुंबईसारख्या ठिकाणी पाण्यासाठी अशी जीवघेणी अवस्था होते याच दुख आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- सुनील विश्वकर्मा, वर्षानगर रहिवासीआजही रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या प्रकाशात पाण्याच्या बादल्या, हंड्या घेवून चढउतार करत आहोत. आधीच कमी वेळ त्यात, दबावही कमी झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.- ज्ञानेश्वर अण्णा बोलकडे, वर्षानगर रहिवासी