शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

वैश्विक अनुभूतीचा लोकप्रवाह म्हणजे वारी

By admin | Published: May 19, 2015 1:18 AM

‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते एक नैतिकतेचे चालतेबोलते लोकविद्यापीठ आहे.

पुणे : ‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते एक नैतिकतेचे चालतेबोलते लोकविद्यापीठ आहे. एकात्मतेची दिंडी निघाली. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. समतेची पताका खांद्यावर फडकली. अवघाची संसार सुखाचा झाला, संत विचारांच्या वैश्विक अनुभूतीचा लोकप्रवाह वारीच्या रूपात वाहू लागला,’’ असे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.आल्हादिनी संस्थेच्या वतीने पौड रस्ता येथील गुरुराज सोसायटीतमधल्या गणेश सभागृहात संतविचार व्याख्यानमालेत ते ‘पंढरीची वारी’ या विषयावर बोलत होते. डॉ. देखणे म्हणाले, ‘‘ज्ञान, भक्ती, प्रीति, समाधान, संयम, श्रद्धा, शूचिता याची अनुभूती देणारे वारी हे एक महान विद्यापीठ आहे. पांडुरंग हा या विद्यापीठाचा पदसिद्ध कुलपती आहे. पुंडलिक हा आद्य कुलगुरू आहे. ज्ञानोबा-तुकोबादि संतपरंपरेने त्याचे कुलगुरूपद अभिमानाने भूषविले आहे; तर त्याच विद्यापीठातून ‘सच्चिदानंद’ पदवी घेऊन वारकरी अखंड वाटचाल करतो आहे.’’‘आल्हादिनी’ या संस्थेच्या वतीने संतविचार व्याख्यानमालेत दोन दिवस डॉ. देखणे यांच्या ‘भारुड-गवळण’ आणि ‘पंढरीची वारी’ या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेच्या वतीने दीपाली दातार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. गुरुराज सोसायटीचे श्रीकांत पाठक आणि सूर्यकांत देशपांडे यांचे व्याख्यानमालेच्या आयोजनात सहकार्य केले. (प्रतिनिधी)४ डॉ. देखणे यांनी वारीची परंपरा, प्राचीनता, त्याचे स्वरूप, विठ्ठलभक्ती, रिंगण, धावा, त्याचे लोकजीवनातील स्थान याची माहिती देत पंढरीची वारी उभी केली.