शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आता मंत्रीपद देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यातही काँग्रेसची वाटचाल संथ !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 12:03 PM

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटून गेल्यानंतर तसेच अनेक संकटे बाजुला सारत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. अजित पवार यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावून सरकार स्थापन्याची हालचाल केल्याने महाविकास आघाडी फिस्कटल्याचे चित्र होते. त्यावेळी आघाडी फिस्कटण्यास काँग्रेसचा संथ कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात होते. आता मंत्रीपदांचे वाटप करण्यातही काँग्रेसकडून तसाच विलंब होत असल्याची चर्चा मित्रपक्षांमध्ये सुरू आहे. 

शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढले होते. तर शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे शिवसेना-भाजपने सरकार स्थापने आपेक्षीत होते. मात्र शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीमुळे युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने नवीन मित्र शोधण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सेनेला आधी राष्ट्रवादीची साथ मिळाली. मात्र बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक होता. त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र काँग्रेसकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता. 

दरम्यान अनेक संकटानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि काँग्रेसला 13 मंत्रीपदं देण्याचं ठरल आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकला नाही. 

मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. त्यातच अधिवेशन जवळ आले असून पहिल्या अधिवेशनाला सरकार सहा मंत्र्यांवरच सामोरे जाणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.