शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नळात नाही; डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 9, 2014 01:27 IST

सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असून तेवढय़ाच वेगाने पाणी टंचाईची समस्याही भीषण स्वरूप धारण करीत आहे. एक-दोन नाही तर अख्ख्या शहरभरातील शेकडो वस्त्यांमध्ये

उन्हाळ्याचा प्रकोप : नागरिक म्हणतात जगावे कसे?नागपूर : सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत असून तेवढय़ाच वेगाने पाणी टंचाईची समस्याही भीषण स्वरूप धारण करीत  आहे. एक-दोन नाही तर अख्ख्या शहरभरातील शेकडो वस्त्यांमध्ये पाण्याची चणचण जाणवत आहे. विशेषत: नळ पाईपलाईन नसलेल्या परिसरातील  परिस्थिती भयावह आहे. नागरिकांना पुरवून-पुरवून पाणी वापरावे लागत आहे. टँकरचे पाणी मिळविण्यासाठी भांडणे होत आहेत. बळाचा वापर करून  टँकर आपापल्या वस्तीकडे वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. पाणी टंचाईवरून राजकारणही खेळले जात आहे. महानगरपालिकेवर मोर्चे काढले जात  आहेत. नळ पाईपलाईन असलेल्या ठिकाणीही फारशी चांगली परिस्थिती नाही. नियमित, शुद्ध व पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे  नागरिकांच्या डोळ्यांत  पाणी आले आहे.  अशा अवस्थेत जगावे कसे, हा एकच प्रश्न नागरिक विचारत आहेत. केवळ पाण्यासाठी!आशीनगर, नेहरूनगर व लकडगंज या तीन झोनमध्ये अक्षरश: पाणी पेटले आहे. या भागात सर्वाधिक पाणी समस्या आहे.  नळ पाईपलाईन असलेल्या  भागाचा विचार करता नेहरूनगरमध्ये ५७, आशीनगरमध्ये २१ व लकडगंजमध्ये १५, तर पाईपलाईन नसलेल्या भागाचा विचार करता लकडगंजमध्ये  ९५, आशीनगरमध्ये ९३ व नेहरूनगरमध्ये ३४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नागपूर शहराला पेंच व कन्हान जलाशयातून पाणीपुरवठा  केला जातो. प्रत्येक टाकीवर टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था आहे.  सध्या एक टँकर सरासरी ८-९  फेर्‍या करीत आहे.  उन्हाळ्यात खासगी  कंपन्या, संस्था, संघटना, लग्नसोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पाणी खरेदी केले जाते. यामुळे टँकरची मागणी आणखीच वाढली आहे.  झोपडपट्टय़ा, अविकसित ले-आऊट व मनपा हद्दीच्या सीमेवरील वस्त्यांमध्ये  लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.सार्वजनिक विहिरींची अवस्था वाईटशहरात  एकूण ७४0 सार्वजनिक विहिरी असून अनेक विहिरींची अवस्था वाईट आहे. शहरात क्वचित प्रसंगीच विहिरीवरून पाणी भरले जाते. यामुळे  उन्हाळ्यात विहिरीतील पाणी मोटारच्या मदतीने नागरिकांच्या घरापर्यंंंंत पोहोचविण्याची सोय केली जाऊ शकते. त्यासाठी पाणी शुद्ध ठेवणे आवश्यक  आहे. परंतु, बर्‍याच बारमाही विहिरी नियमित स्वच्छ केल्या जात नाही. परिणामी पाण्यात केरकचरा साचला आहे. पाणी दूषित झाले आहे. काही  विहिरी आटल्या आहेत. वर्षभर पाणी टिकण्यासाठी या विहिरी आणखी खोल करणे आवश्यक आहे. विहिरींचे पाणी उपयोगात आणले तर पाणी  टंचाईची भीषणता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. विहिरी जिवंत ठेवण्यासाठी पाण्याचा उपसा करणे गरजेचे आहे.व्यर्थ जाते टँकरमधील पाणीजाणकारांच्या माहितीनुसार, पाणीपुरवठा करणारे सुमारे ३0 टक्के टँकर गळके असल्यामुळे रोज हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते. टँकरने पाणीपुरवठा  करण्यावर महापालिका वर्षाकाठी १३ ते १४ कोटी रुपये खर्च करते. परंतु, हजारो लिटर पाणी रोडवरच सांडून व्यर्थ जात असल्याने मनपाचे सुमारे ४  कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. टँकर लॉबीच्या दबावामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. पाण्याची भरमसाट बिले  आकारणार्‍या प्रशासनाने टँकरमधून गळणार्‍या पाण्याचा हिशेब देण्याची मागणी होत आहे. सुगतनगर म्हाडा कॉलनी सुगत नगर म्हाडा कॉलनीत पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. या कॉलनीत जलवाहिन्यांद्वारे घरोघरी नळ पोहचले आहे. मात्र नळाला पाणीच  नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  सकाळी उठल्यापासून कुटुंबातील प्रत्येकजणाची पाण्यासाठी वणवण सुरू होते. दोन  दिवसाआड कॉलनीत टँकर येतो. टँकर आला रे आला की लोकांची झुंबड उडते, उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी दररोज भांडण होत आहे. नारी नारी जुनी वस्तीत दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे संकट निर्माण होते. येथे घरोघरी नळ पोहचले, मात्र टाकीवरून पाणीच सोडले जात नाही. वारंवार झोन  कार्यालयात तक्रारी केल्यावर कुठलातरी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. लवकरच समस्यांचे समाधान होईल सांगितले जाते. मात्र आजपर्यंंंंत  समस्या सुटल्या नाही. झोनच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा नळाला पाणी न सोडता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर भर दिसतो आहे. सेमिनरी हिलसेमिनरी हिल परिसरातील जय बजरंग सोसायटी, मानवसेवा नगर या वस्त्या उंचावर असल्याने, येथे जलवाहिनीचे नेटवर्क असूनसुद्धा पर्याप्त पाणी  मिळत नाही. उन्हाळ्यात तर अवस्था अतिशय बिकट झाली आहे.  संध्याकाळी एक तास नळ येतो. मात्र धार कमी असल्याने केवळ पिण्याचे पाणी  मिळत आहे. वापरण्यासाठी आवश्यक असणारे पाणी टँकरशिवाय उपलब्ध नाही. टँकरही सहज येत नाही. परिसरात राहणारे सेवाराम हेडावू यांना  टँकरची आवश्यकता होती. मात्र दोन दिवसांपासून टँकर मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आज सुटी घेऊन टाकीवर जाऊन बसल्यानंतर त्यांना टँकर  मिळाला. मानेवाडारिंगरोडच्या पलीकडे येणार्‍या मानेवाडा परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागतो.  या  भागातील बहुतांश नगरांमध्ये जलवाहिनीचे नेटवर्क आहे. मात्र दिवसभरात केवळ १५ ते २0 मिनिटे नळ सुरू राहतो. विज्ञान नगर, अभय नगर, शाहू  नगर, चिंतामणी नगर, जानकी नगर, न्यू अमरनगर, गुरुकुंजनगर, शेष नगर अवधूत नगर या परिसरातील काही भागात जलवाहिन्या नाही. येथील लोक  विहीर आणि बोअरवेलवर अवलंबून आहे. उन्हाळ्यात विहिरी आटल्या आहेत. बोअरला पाणी नाही. टँकर आठ आठ दिवस येत नाही. विशेष म्हणजे  या प्रभागातील नगरसेवक मनपाच्या जल समितीचे अध्यक्ष आहे. येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी टँकर अडविले, नगरसेवकाच्या  घरासमोर मटकाफोड आंदोलन केले. मात्र पाण्यासाठी त्रास काही कमी झाला नाही.