शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 05:43 IST

‘पुणे ॲग्रो हॅकॅथान २०२६’ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा येत्या ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  
पुणे : मराठा समाजासाठी राज्य सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जेवढे काम केले, ते महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही सरकारने केले नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

‘पुणे ॲग्रो हॅकॅथान २०२६’ पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा येत्या ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेक मराठा तरुण आयएएस, आयपीएस आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवित आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार झाले आहेत. शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि निर्वाह भत्ता योजना सुरू असून, कोणतीही योजना बंद नाही. ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही, त्यांच्यासाठी निर्वाह भत्त्याची योजना आहे. नवीन हॉस्टेल तयार करत आहोत.  जे प्रमाणपत्र मागितले जाते, त्यातील जे प्रमाणपत्र नियमात बसते, ते प्रमाणपत्र दिले जाते. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या निकषांनुसारच काम सुरू आहे. समितीमध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही.  सातारा गॅझेटसंदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कायदेशीर सल्ल्यानुसारच सरकार काम करत आहे. 

राज्यात ऊर्जा संकट नाही
राज्यात कुठलेही ऊर्जा संकट नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक वीज उपलब्ध आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे तात्पुरती समस्या निर्माण होते. मात्र, संपूर्ण पुरेशी वीज उपलब्ध आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले की, अमलीपदार्थांचे संकट हे केवळ महाराष्ट्रासमोर नसून संपूर्ण देशासमोर आहे. 
देशभर ड्रग्जविरोधी मोहीम सुरू असून, महाराष्ट्र त्यात अग्रस्थानी आहे. महाराष्ट्राची तुलना उडता पंजाबशी करणे चुकीचे आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न योग्य नाही. राज्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आमचा मित्र पक्ष आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : No Maratha scheme stopped; we worked most: Fadnavis clarifies.

Web Summary : Fadnavis asserted his government did unprecedented work for the Maratha community, continuing all schemes. He addressed concerns about reservations and energy availability, dismissing comparisons to 'Udta Punjab' and affirming sufficient power supply in Maharashtra.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील