शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला आघाडी तोडण्याची घाई!

By admin | Updated: August 13, 2014 02:57 IST

विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा करून त्यानिमित्ताने काँग्रेससोबतची आघाडीच तोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे असल्याचे आता म्हटले जात आहे.

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा करून त्यानिमित्ताने काँग्रेससोबतची आघाडीच तोडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे असल्याचे आता म्हटले जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाशी कुठलीही चर्चा न करता तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्याआधी त्यांनी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी हे सगळे करण्यात आले आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीच करायची नाही यासाठीचे कारण यानिमित्ताने शोधले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुरुवातीपासून आग्रह असल्याचे म्हटले जाते. त्यांचे खंदे समर्थक तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दोघांनी स्वबळासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर दबाव वाढविल्याचे म्हटले जाते. त्यातच स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीच्या जागा वाढतील, असे सर्वेक्षण समोर येत असल्याने त्यांचा वापरही आपला मुद्दा रेटण्यासाठी करून घेतला जात आहे.काँग्रेस पक्ष मोहन जोशी यांच्या उमेदवारीवर ठाम राहिला तर आघाडी तोडण्याची धमकी राष्ट्रवादीकडून दिली जाऊ शकते. त्यावर काँग्रेसकडून काय प्रतिसाद येतो, यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून असेल. विधान परिषदेची जागा काँग्रेसची नाही, ती दोघांसाठीही खुली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना सांगितले. दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीचे संयोजक म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेच्या जागेबाबत आम्हाला विश्वासात घेऊन आधी निर्णय करायला हवा होता, असे सांगून त्यांनी आज निर्माण झालेल्या तिढ्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. (विशेष प्रतिनिधी)