शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; "माझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके अन् कपडे घेतले नाही, कारण..."

By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 17:24 IST

CM Uddhav Thackeray News: आम्हाला दिवाळीत कपडे नाही, फटाके नाही, त्यामुळे आईला सांगितलं तर आई-बाबा दोघं भांडण करतात म्हणून नुकसानीचे पैसे बँकेत टाकावे अशी विनंती समिक्षा सावके हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

ठळक मुद्देमाझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके आणि कपडे घेतले नाहीया वर्षी आमच्या गावात पाऊसामुळे लय पाणी आलं. या पावसामुळे सोयाबीन कमी झालेहिंगोलीत नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता १५४ कोटींची गरज

हिंगोली – अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे गेल्या ५ महिन्यात जवळपास २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २२ ऑक्टोबरला शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला होता, मात्र दिवाळी आली तरी अद्यापही शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून अपेक्षेने पाहत आहेत.

यात समिक्षा सावके नावाच्या चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलंय की, माझ्या बाबांनी यंदा दिवाळीत फटाके आणि कपडे घेतले नाही. या वर्षी आमच्या गावात पाऊसामुळे लय पाणी आलं. या पावसामुळे सोयाबीन कमी झाले, आपल्याकडे पैसे नाहीत असं बाबा म्हणाले तसं यावर्षी आपलं कर्जही माफ झालं नाही, उडीद खराब झाले असंही समिक्षाने पत्रात सांगितले आहे.

तसेच माझे बाबा रात्री वावरात पाणी पाजायला जातात. दिवाळी असल्याने त्यांना घरी राहा म्हंटले. पण दिवसा लाईट नाही असं बाबांनी सांगितले. मी आणि माझ्या भावाने बाबांना फटाके आणि कपडे घ्या म्हंटलं पण नुकसानीचे पैसे बँकेत आल्यावर घेऊ असं बाबांनी सांगितले. आम्हाला दिवाळीत कपडे नाही, फटाके नाही, त्यामुळे आईला सांगितलं तर आई-बाबा दोघं भांडण करतात म्हणून नुकसानीचे पैसे बँकेत टाकावे अशी विनंती समिक्षा सावके हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

हिंगोलीत नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे.

दिवाळीपर्यंत पैसे देण्याचा होता सरकारचा दावा

निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्याना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविलं होतं. परवानगी मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळायला सुरूवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूर