शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 19:45 IST

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे.

 मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल उत्तर मुंबईचे भाजप (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे खास पत्र लिहून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि हितासाठी नाणार प्रकल्पासंदर्भात आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. (MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in Ratnagiri )...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली. यावेळी, रत्नागिरी राजापूरची रिफायनरी  चालू करून नाणार प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राबद्धलही शेट्टी यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना काळात देशत अनेकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात अमर्याद स्वयंरोजगाराच्या संधी देणारा हा प्रकल्प सुरू करण्यात आला, तर नवीन पिढीसाठी रोजगार निर्मितीची मोठी पार्श्वभूमी तयार होणार आहे. असेही शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

याच बरोबर, 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नाणार प्रकल्प नाकारणे योग्य ठरणार नाही. यासंदर्भातील वाद सुरुवातीपासूनच चिघळलेला आहे. पण 2000 कोंकणवासियांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात, या प्रकल्पात स्थानिक कोंकणी माणसांच्या रोजगारला प्राधान्य देण्याची तजवीज केली आहे. उद्योग निर्मितीची मोठी संधी प्रामुख्याने कोकणातील तरुणांना दिली तर एकूण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हे हिताचे ठरेल, असे मतही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. एकेकाळी संगणक आले की बेरोजगारी वाढत जाईल, अशी भीती बाळगली जात होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे संगणका मार्फत "डिजिटल इंडिया"मुळे जागतिक पातळीवर पोहचले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याच बरोबर मारुती सुझुकीला एकेकाळी विरोध झाला आणि नंतर त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, याकडेही खासदार शेट्टी यांनी राज ठाकरेंचे लक्ष वेधले.

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

एखादा मोठा प्रकल्प किंवा बदल घडणार असेल तर त्याला विरोध होणे, हे साहजिकच आले. पण नाणार प्रकल्पामुळे कोंकणबरोबरच देशात बदल घडत असेल तर या प्रकल्पाचा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने फेरविचार करावा लागेल. मात्र, फक्त संघर्षामुळे विकासाच्या वाटा बंद होऊन तमाम जनतेचे हित लांबवले जात आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपाMNSमनसे