शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आंदोलनातून नवी मुंबई बाहेर, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 05:34 IST

मराठा आरक्षणासाठी २५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत हिंसेच्या घटना घडल्या होत्या.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी २५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत हिंसेच्या घटना घडल्या होत्या. ९ आॅगस्टच्या आंदोलनाला पुन्हा गालबोट लागू नये याकरिता शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा बंद केला जाणार नसल्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.२५ जुलैच्या आंदोलनावेळी नवी मुंबईत ठिकठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून दोन गटांत उद्भवलेल्या वादातून कोपरखैरणेत एका आंदोलकाचा मृत्यू झाला. आंदोलनात मिसळलेल्या काही हिंदी भाषिक समाजकंटकांकडून हिंसा घडवली जात होती. त्यांच्यामुळेच स्थानिक विरुद्ध मराठा असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. दोन्ही समाजात अनेक वर्षांपासून एकोपा असून तो भविष्यातही टिकून राहावा ही सर्वांची इच्छा आहे. परंतु ९ आॅगस्टला पुन्हा मराठा आरक्षणासाठी शहरात बंद अथवा आंदोलन केल्यास हिंसेची पुनरावृती होऊ शकते. पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नवी मुंबईला आंदोलनातून वगळल्याची घोषणा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली. एपीएमसी येथील माथाडी भवनमध्ये झालेल्या बैठकीअंती हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी सकल मराठा आरक्षण समितीचे समन्वयक अंकुश कदम यांनी आंदोलनाला गालबोट लावून समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आजवर आरक्षणाच्या मोर्चा, बंदला कसलेही गालबोट लागलेले नाही, तर प्रत्येक आंदोलनावेळी स्थानिकांनी पुरेपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे दोन्ही समाजात निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी संयुक्तरीत्या हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.नवी मुंबईत पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांकडून पुरेपूर प्रयत्न होत आहेत. त्यानुसार दोन्ही समाजाच्या प्रमुखांनी तरुणांना सामंजस्याने राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही काहींनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाईचे पोलिसांना पूर्णपणे स्वातंत्र्य राहणार असल्याचेही सूचित केले आहे.मुंबईतील समन्वयकांनी घेतलेल्या बैठकीत सर्व मराठा बांधवांनी एकत्रित येत उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या देतील. तसेच समन्वयकांचे शिष्टमंडळ उपनगराचे जिल्हाधिकारी यांना मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन देतील. ज्या मराठा बांधवांना वांद्रे येथे पोहोचता येणार नाही, त्यांनी काळ्या फिती लावून कामाच्या ठिकाणी मराठा समाजावरील अन्यायाचा निषेध नोंदविण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.>मुंबईत देणार ठिय्यामुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयकांनी गुरुवारी,९ आॅगस्ट रोजी वांद्रे येथील चेतना महाविद्यालयानजीक असलेल्या मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये असलेल्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण