शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला शाबासकी

By admin | Updated: June 5, 2015 01:14 IST

भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे.

नागपूर : मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले आहे. भारतात जे बदल होत आहेत त्यामुळे जगात देशाचे स्थान व प्रतिष्ठा वाढत आहे,या शब्दांत खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीच सरकारला शाबासकीची थाप दिली आहे. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, डॉ.मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सत्ताबदलानंतर देशात सकारात्मक बदलांचा जनतेला अनुभव होत आहे. जगात भारत क्रमांक एकवर नसला तरी आपल्याबद्दल इतर देशांच्या आशाआकांक्षा वाढल्या आहेत. जगाला भारताबाबत विश्वास आहे व भविष्यातील महाशक्ती म्हणून भारताचेच नाव सर्वात प्रथम घेतल्या जात आहे. आपल्या देशाकडून स्वत:च्या स्वार्थाचा ‘अजेंडा’ कधीही राबविण्यात आलेला नाही. देश मोठा होत आहे, कारण येथे तसे कर्तृत्व असणाऱ्या व्यक्ती आहेत, असे डॉ. भागवत म्हणाले. मी गेल्या अनेक वर्षांपासून देशात होणारे बदल पाहतो आहे. येथे सर्वसमानतेचा भाव वाढत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका सांभाळायला पाहिजेत. परंतु देशहितासाठी राष्ट्रीयभावाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.हेगडे यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी गोविंदसिंह टांक, महानगर संघचालक राजेश लोया हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती व नभोवाणी राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड आदी उपस्थित होते. यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग ११ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ८७६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीलाविविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)सर्वसमानतेचा भाव मी गेल्या अनेक वर्षांपासून देशात होणारे बदल पाहतो आहे. येथे सर्वसमानतेचा भाव वाढत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका सांभाळायला पाहिजेत. परंतु देशहितासाठी राष्ट्रीयभावाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.हेगडे यांनी व्यक्त केले.