शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील प्राध्यापकांना पंजाबतर्फे ‘जी आया नू’

By admin | Updated: June 11, 2015 01:29 IST

मी तब्बल ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा आलो आहे. या मराठी मातीचा काय गुण आहे कळत नाही, पण इथे आल्यानंतर मनाला फार मोठे समाधान मिळते.

संत नामदेव पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर कसे वाटते आहे?मी तब्बल ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा आलो आहे. या मराठी मातीचा काय गुण आहे कळत नाही, पण इथे आल्यानंतर मनाला फार मोठे समाधान मिळते. यापूर्वीही मला असाच अनुभव आला होता. संत नामदेव अध्यात्माची पताका घेऊन पंजाबात आले, तर गुरू गोविंदसिंग महाराष्ट्रात नांदेड येथे आले होते. महाराष्ट्र आणि पंजाबचे हे नाते दृढ व्हावे, यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची इच्छा आहे.त्या दिशेने आपण काही पावले उचलली आहेत का?- पंजाबमधील विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासन सुरू केले आहे. संत नामदेवांचा व संत साहित्याचा अभ्यास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्राध्यापकांचे तिथे स्वागत आहे. महाराष्ट्रातून संत साहित्याच्या अभ्यासकांनी तिथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवावे. दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक आदानप्रदान व्हावे, असे मला वाटते. तुम्ही हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला भेट दिलीत, त्यामागची भावना काय होती ?- भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पंजाब व महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. राजगुरू, विष्णू गणेश पिंगळे ही क्रांतिकारक मंडळी पंजाबात आली होती. मी त्यांच्या वारसांना भेटलो. त्यांना स्वत:साठी काहीही नको. हुतात्मा झालेल्या आपल्या पूर्वजांचे नाव कायम राहावे, एवढेच त्यांना हवे आहे. सैन्य दलात शीख बांधव नेहमी आघाडीवर कसे असतात? - शिखांचा स्वभावच लढाऊ आहे. कोणत्याही लढाईत शीख नेहमीच संख्येने जास्त असतात, हा इतिहास आहे. स्वातंत्र्ययुद्धातही शिखांचा मोठा सहभाग होता. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारेही शीखच जास्त. आम्हाला त्याचा अभिमान आहे.देशातील धार्मिक उन्मादाच्या वातावरणास भाजपाला जबाबदार धरले जात आहे; त्याविषयी तुम्ही काय सांगाल? - पंजाबातील भाजपाबरोबरची आमची युती ही राजकीय घटना आहे. सर्व धर्मांबाबत आम्हाला आदरच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयानेही दुसऱ्याच्या धर्माबाबत असाच आदर बाळगला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. पंजाबातील दहशतवादाची सद्य:स्थिती काय आहे?- पंजाबने खूप वाईट दिवस पाहिले आहेत. देशातील अशांत प्रांत म्हणून पंजाब ओळखला जात होता. त्या अस्थिरतेतून आता आम्ही बाहेर आलो आहोत. आज देशातील सर्वात शांत, सामाजिक सलोखा जपणारा व तितकाच समृद्ध प्रांत म्हणून पंजाब पुन्हा ओळखला जाऊ लागला आहे. प्रांतभेद आणि जातीय राजकारण संपवण्यासाठी काय करायला हवे?- देशातील संतांचे विचारच आपल्या देशाला तारू शकतात. गुरुवाणीनुसार आपले आचरण राहिले तर कसलेही वाद होणार नाहीत, भांडणे होणार नाहीत. परस्परांचा संवाद वाढवला पाहिजे. देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ते आताचे देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री असे दोन्ही विक्रम तुमच्या नावावर आहेत. इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबाबत काय वाटते?- काम करण्याची मला आवड आहे, मी ते करीत आलो आहे. देशातील राजकारणाची शैली बदलली आहे, मात्र तो काळाचा परिणाम आहे. काही गोष्टी आहेत, मात्र त्याविषयी आता बोलता येणार नाही. शरद पवार यांच्याबरोबरची मैत्री तर राजकारणाच्या पलीकडची आहे. राज ठाकरे यांची युवकांमध्ये क्रेझ आहे. त्यांना मी पंजाबला येण्याचे खास निमंत्रण दिले आहे.