शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात भरपाई आता अडीचपटच!

By admin | Updated: December 31, 2014 10:01 IST

केंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यात ग्रामीण भागात प्रचलित बाजारभावाच्या चारपट भरपाई देण्याची तरतूद कायम ठेवली

भूसंपादन वटहुकूम : शिफारशीपेक्षा दीडपट कमी, प्रकल्पग्रस्तांना फटकासंदीप प्रधान - मुंबईकेंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यात ग्रामीण भागात प्रचलित बाजारभावाच्या चारपट भरपाई देण्याची तरतूद कायम ठेवली असली तरी महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केलेल्या नियमावलीनुसार केवळ कमाल अडीचपट भरपाई दिली जाणार आहे. शहरात दुप्पट भरपाई देण्याची तरतूद तशीच्या तशी स्वीकारलेली आहे.काँग्रेस राजवटीत नवीन भूसंपादन कायदा केला गेला. त्यामधील सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट आणि ठरावीक उद्दिष्टांकरिता जमीन संपादित करताना ७० टक्के जमीन मालकांच्या संमतीची अट केंद्रातील भाजपा सरकारने सोमवारी वगळली. मात्र जमिनीच्या दराबाबतची तरतूद तशीच ठेवली. २०१३ च्या भूसंपादन कायद्याच्या कलम २६ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे मूल्य निश्चित करण्याच्या असलेल्या अधिकारानुसार नागरी क्षेत्रापासून ग्रामीण क्षेत्राकडील अंतर जसजसे वाढत जाईल तसतसे मल्टिप्लायर फॅक्टर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. महापालिका क्षेत्रापासून ० ते १० कि.मी. या अंतरामधील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १ राहणार आहे. महापालिका क्षेत्रापासून १० ते २५ कि.मी. अंतरामधील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १.०५ राहणार आहे, तर महापालिका क्षेत्रापासून २५ कि.मी. व त्यापेक्षा अधिक अंतरावरील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १.१० राहणार आहे.विमानतळवासीयांना २२.५ टक्के विकसित जमीननवी मुंबई विमानतळाकरिता जमीन संपादित करताना जमीनमालकांना एकरी २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात येणार आहे. त्यामुळे एक एकर विकसित जमीन मिळणाऱ्याला बाजारभावानुसार चार कोटी रुपये मूल्याची जमीन मिळेल. या जमिनीपैकी १२.५ टक्के जमिनीवर १.५, तर उर्वरित १० टक्के जमिनीवर २.५ एफएसआय दिला जाणार आहे. याखेरीज ज्यांची घरे या प्रकल्पामुळे बाधित होणार त्यांना अन्यत्र घरबांधणीकरिता प्रति चौ.फू. एक हजार रुपये, घरातील सामानसुमान हलविण्याकरिता वाहतूक खर्च, विमानतळाचे १० रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स, असे लाभ दिले जाणार आहेत.जैतापूरवासीयांना २२.५ लाख प्रति हेक्टरजैतापूर येथील सुमारे १० हजार मे.वॅ़ वीजनिर्मिती क्षमता असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाकरिता प्रकल्पग्रस्तांना प्रति हेक्टर २२.५ लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. २५ कोटी रुपये परिसर विकासाकरिता, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांना अणुऊर्जा प्रकल्पातून सवलतीच्या दरातील वीजपुरवठा, एक आयटीआय व एका हॉस्पिटलची उभारणी, नाटे व साखरी येथील मच्छीमारांना नवीन बोटी व नवीन मासळी मार्केट.