शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:32 IST

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं.

मुंबई - राज्याच्या राजकारणात २९ जूनचा दिवस राजकीय भूकंप घडवणारा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जात राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंद पसरला आहे. पुन्हा एकदा राज्यात भाजपाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत करत राहिले पण हे सरकार केवळ २.५ वर्षातच पडले अशी चर्चा सुरू झाली आहे. 

त्यातच मागील अनेक महिन्यांपासून भाजपा नेते सरकार पडण्याची डेडलाईन देत होते. अनेकदा भाजपा नेत्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच १९ एप्रिल रोजी एक विधान करत मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितले. नारायण राणे म्हणाले होते की, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले नाही, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. 

त्यामुळे राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू झाली. या निवडणुकीत भाजपाने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार उभे केले. निवडणुकीत दगाफटका बसण्याची शक्यता लक्षात घेता या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या निवडणुकीत राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या, विधान परिषदेत ५ उमेदवार उभा करा असा प्रस्ताव या नेत्यांनी दिला. परंतु तोच प्रस्ताव फडणवीसांनी मविआ नेत्यांना दिला. तुम्ही भाजपाचा तिसरा उमेदवार राज्यसभेत पाठवून द्या, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याबदल्यात भाजपा विधान परिषदेत पाचवा उमेदवार उभा करणार नाही असं म्हटलं. मात्र महाविकास आघाडी पक्षातील असमन्वयामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली. 

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं. त्यानंतर २० जूनच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार रिंगणात उतरवले. मविआच्या आमदारांमध्ये असंतोष असल्याने अतिरिक्त उमेदवार उभा केल्याचा दावा भाजपाने केला. नेमकाच हाच असंतोष निकालात पाहायला मिळाला. शिवसेनेसह काँग्रेसही काही मते फुटल्याने भाजपाचा उमेदवार जिंकून आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात मंत्री एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले आणि शिवसेनेला धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदारांनी मविआ सरकारपासून फारकत घेतली आणि अखेर २९ जून रोजी सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नारायण राणेंचे ते विधान अगदी खरे ठरले. २ महिन्यात राजकीय चक्रे वेगाने फिरली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ