शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:32 IST

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं.

मुंबई - राज्याच्या राजकारणात २९ जूनचा दिवस राजकीय भूकंप घडवणारा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जात राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंद पसरला आहे. पुन्हा एकदा राज्यात भाजपाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत करत राहिले पण हे सरकार केवळ २.५ वर्षातच पडले अशी चर्चा सुरू झाली आहे. 

त्यातच मागील अनेक महिन्यांपासून भाजपा नेते सरकार पडण्याची डेडलाईन देत होते. अनेकदा भाजपा नेत्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच १९ एप्रिल रोजी एक विधान करत मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितले. नारायण राणे म्हणाले होते की, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले नाही, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. 

त्यामुळे राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू झाली. या निवडणुकीत भाजपाने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार उभे केले. निवडणुकीत दगाफटका बसण्याची शक्यता लक्षात घेता या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या निवडणुकीत राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या, विधान परिषदेत ५ उमेदवार उभा करा असा प्रस्ताव या नेत्यांनी दिला. परंतु तोच प्रस्ताव फडणवीसांनी मविआ नेत्यांना दिला. तुम्ही भाजपाचा तिसरा उमेदवार राज्यसभेत पाठवून द्या, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याबदल्यात भाजपा विधान परिषदेत पाचवा उमेदवार उभा करणार नाही असं म्हटलं. मात्र महाविकास आघाडी पक्षातील असमन्वयामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली. 

जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं. त्यानंतर २० जूनच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार रिंगणात उतरवले. मविआच्या आमदारांमध्ये असंतोष असल्याने अतिरिक्त उमेदवार उभा केल्याचा दावा भाजपाने केला. नेमकाच हाच असंतोष निकालात पाहायला मिळाला. शिवसेनेसह काँग्रेसही काही मते फुटल्याने भाजपाचा उमेदवार जिंकून आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात मंत्री एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले आणि शिवसेनेला धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदारांनी मविआ सरकारपासून फारकत घेतली आणि अखेर २९ जून रोजी सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नारायण राणेंचे ते विधान अगदी खरे ठरले. २ महिन्यात राजकीय चक्रे वेगाने फिरली आणि राज्यात सत्तांतर घडून आले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ