शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

महाविकासआघाडीचं सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 17:08 IST

'शिवसेना युती हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित होती.'

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकासआघाडी असे नवे सरकार राज्यात स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, हे महाविकासआघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 

भाजपा-शिवसेना युती हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित होती. आजही आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. अशी युती तोडणे म्हणजे केवळ देशाचेच नव्हे तर हिंदुत्व आणि महाराष्ट्राचे नुकसान आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, राज्यातील नवे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थिर राहणार नाही, हे सरकार महाराष्ट्राच्या भल्याचे नाही. अस्थिर सरकार आल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

ही आघाडी कोणत्याही सिद्धांतांच्या, विचारांच्या जोरावर बनलेली नाही. शिवसेनेच्या विचारांशी काँग्रेस कधी सहमत नव्हती आणि नसेल. त्याचबरोबर काँग्रेस ज्या विचारांवर बनलेला पक्ष आहे, ते विचार शिवसेनेला मान्य नाहीत. ही एक सत्तेसाठी बनवलेली संधीसाधू आघाडी आहे. याचबरोबर, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, असाही नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. 

दरम्यान, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपाकडून अडीच- अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरु केली आहे. तसेच, शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा