शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:18 IST

संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली, त्यामुळे ठाकरे गट भाजपासोबत जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई - भाजपा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना घाबरली आहे. आम्ही एवढा संघर्ष केलाय तो त्यांच्यासोबत जायला केलाय का? आमची लढाई महाराष्ट्राच्या शत्रूशी, ज्यांनी हा महाराष्ट्र लुटला त्यांच्यासोबत आहे. लुटारू टोळीच्या सरदारासोबत आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भीती दाखवते. हे षडयंत्र आहे. जे देशाचे संविधान संपवू इच्छितात. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळतायेत, शिवसेना कधीही अशा लोकांसोबत जाणार नाही आणि त्यांच्यासमोर झुकणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत हे अमित शाहांना भेटले अशा बातम्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्यानंतर राऊतांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली हा हास्यास्पद प्रश्न आहे. हा जर काँग्रेस नेत्यांचा दावा असेल तर आम्हाला खरोखर आश्चर्य वाटतं. या शक्तींशी सगळ्यात जास्त कुणी संघर्ष केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. केवळ संघर्ष केला नाही तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात टाकलं. आमचा पक्ष फोडला. आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. हा संघर्ष अशा टोकाला आला आहे जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो असा पाणउतारा राऊतांनी केला. 

तसेच  स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शितोंडे उडवणारे लोक आहेत. बातम्या पसरवून अफवा पसरवून जर कुणी लढत असेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. या बातम्या कुणी पसरवल्या याची माहिती आम्हाला मिळाली आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे अफजलखान, औरंगजेबाशी हातमिळवणी करणे असा घणाघातही संजय राऊतांनी भाजपासोबत जाण्याच्या प्रश्नावरून केला आहे.

दरम्यान, अफवा पसरवल्या जातायेत. प्रतिष्ठित वृत्तवाहिन्या या बातम्या दाखवतायेत. माध्यमावर कशारितीने महाराष्ट्राच्या शत्रूचं नियंत्रण आहे हे दिसते. आमचं मन साफ, विचार स्वच्छ आहे. आम्ही कुणाच्याही दबावाखाली येत नाही. आम्ही जे काही करतो ते छातीठोक करतो. आमच्या २१० जागांबाबत तिन्ही पक्षाचं एकमत झालेले आहे.  २१० हा फार मोठा आकडा आहे. त्यामुळे दिल्लीतून कोण तुम्हाला बातम्या पुरवतं हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात आम्ही एकत्र राहायला हवं ही आमची भूमिका आहे. संविधानविरोधी शक्ती, महाराष्ट्र लुटणाऱ्यांचा पराभव आम्ही एकत्र राहून करू असं संजय राऊतांनी महाविकास आघाडीबाबत स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह