शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:36 IST

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा फायदा कुणाला होणार हे निकालात स्पष्ट होईल. तत्पूर्वी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा कल दाखवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी १७०-१७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्याचसोबत काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रि‍पद काँग्रेसकडे असेल असे सूतोवाच केले आहे. मात्र पटोलेंच्या या विधानावर संजय राऊतांनी टोला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं असा टोला त्यांनी लगावला. 

पटोले-राऊतांचा वार-पलटवार

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पहिल्यांदाच असा वाद नाही. हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर तिखट प्रतिक्रिया दिली होती ज्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रिपद यासारख्या विविध मुद्द्यांवरून अनेकदा राऊत-पटोले आमनेसामने आले आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. रात्री ११.३० च्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी आली नाही. त्यामुळे यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपा १४९, शिवसेना ८१ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस १०१, ठाकरे गट ९५ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८६ जागांवर उमेदवार उतरवले होते. महायुती असो वा मविआ यांच्यात काही मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उतरवले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून आले. त्याशिवाय मनसे, वंचित आणि अपक्षांमुळे निकालात किती फरक पडतो हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतMahayutiमहायुतीBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस