शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:36 IST

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा फायदा कुणाला होणार हे निकालात स्पष्ट होईल. तत्पूर्वी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा कल दाखवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी १७०-१७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्याचसोबत काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रि‍पद काँग्रेसकडे असेल असे सूतोवाच केले आहे. मात्र पटोलेंच्या या विधानावर संजय राऊतांनी टोला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं असा टोला त्यांनी लगावला. 

पटोले-राऊतांचा वार-पलटवार

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पहिल्यांदाच असा वाद नाही. हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर तिखट प्रतिक्रिया दिली होती ज्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रिपद यासारख्या विविध मुद्द्यांवरून अनेकदा राऊत-पटोले आमनेसामने आले आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. रात्री ११.३० च्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी आली नाही. त्यामुळे यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपा १४९, शिवसेना ८१ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस १०१, ठाकरे गट ९५ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८६ जागांवर उमेदवार उतरवले होते. महायुती असो वा मविआ यांच्यात काही मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उतरवले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून आले. त्याशिवाय मनसे, वंचित आणि अपक्षांमुळे निकालात किती फरक पडतो हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतMahayutiमहायुतीBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस