शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 12:36 IST

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असून त्याचा फायदा कुणाला होणार हे निकालात स्पष्ट होईल. तत्पूर्वी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा कल दाखवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी १७०-१७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्याचसोबत काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रि‍पद काँग्रेसकडे असेल असे सूतोवाच केले आहे. मात्र पटोलेंच्या या विधानावर संजय राऊतांनी टोला लगावला. 

संजय राऊत म्हणाले की, पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं असा टोला त्यांनी लगावला. 

पटोले-राऊतांचा वार-पलटवार

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पहिल्यांदाच असा वाद नाही. हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर तिखट प्रतिक्रिया दिली होती ज्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीतील जागावाटप, मुख्यमंत्रिपद यासारख्या विविध मुद्द्यांवरून अनेकदा राऊत-पटोले आमनेसामने आले आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. रात्री ११.३० च्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.०२ टक्के मतदान झाले आहे. अद्याप अंतिम आकडेवारी आली नाही. त्यामुळे यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपा १४९, शिवसेना ८१ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ५९ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस १०१, ठाकरे गट ९५ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८६ जागांवर उमेदवार उतरवले होते. महायुती असो वा मविआ यांच्यात काही मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उतरवले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून आले. त्याशिवाय मनसे, वंचित आणि अपक्षांमुळे निकालात किती फरक पडतो हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतMahayutiमहायुतीBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस