शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

महाआघाडीच्या जाहीरनाम्यात 'हे' एकच आश्वासन राहिलंय, मुख्यमंत्र्यांकडून पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:26 PM

सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुन आणि महाआघाडीच्या जाहीरनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून आपल्या उमेदवारी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. धुळ्यातील सभेत बोलताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लक्ष्य केलं. तसेच, काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुनही काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असं वक्तव्य करुन सुशीलकुमार यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचे संकेत सोलापुरातील सभेत दिले आहेत.

सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुन आणि महाआघाडीच्या जाहीरनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. तसेच, राहुल गांधींनाही महाराष्ट्रातील पराभव मान्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय. ''काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेलेत, महाराष्ट्रातील पराभव त्यांनाही माहितीय. पवारांचा पक्ष अर्धा रिकामा झालाय, उरलेला पक्ष निवडणुकीनंतर रिकामा होईल. आता, आमचं वय झालंय, निवडणूक झाली की काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलनीकरण करून टाकू, असं सुशिलकुमार शिंदेंनी म्हटलं. भाजपा-सेनेचा सामना करण्यासाठी अशी अवस्था या पक्षांची झालीय. निवडणूक हरल्याचं यांनी मान्यच केलंय. महाआघाडीने दोन दिवसांपूर्वी जाहीरनामा घोषित केला. त्यांचा जाहीरनामा म्हणजे जगातले सगळेच आश्वासन दिलेत. या जाहीरनाम्यात एकच आश्वासन द्यायचं राहिलंय. ते म्हणजे, 'महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक ताजमहाल बांधून देऊ,' एवढंच आश्वासन द्यायचं राहिलंय, असे म्हणत फडणवीस यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली. 

दरम्यान, सोलापूरमधील सभेत बोलताना शिंदे म्हणाले होते की, कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Mumbaiमुंबई