शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

...तेव्हा मनसेची भाजपासोबत युती होईल; आदित्य ठाकरेंचं विधान, भाजपावर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 7:22 PM

loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे-भाजपासोबत महायुतीत सामील होईल अशी चर्चा सुरू होती. त्यावर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला होता. 

यवतमाळ - Aaditya Thackeray on MNS-BJP ( Marathi News )  आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजपा युती होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु अलीकडेच युतीच्या चर्चांना ब्रेक लागला. मात्र यावर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मनसे-भाजपात युती होईल असं त्यांनी म्हटलं. 

यवतमाळमध्ये पत्रकारांनी मनसे-भाजपा युतीवर प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, उत्तर प्रदेशातील २ टप्प्यानंतर मनसेला सोबत घेतले जाईल अशी भाजपाकडून चर्चा आम्हाला ऐकायला आलीय असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही जाहीर केलेत. महायुतीत ईडी, सीबीआय, भ्रष्टाचारांची गँग आहे तिथे जागावाटपावरून बोली सुरू आहे. मिंदे गटातील ४-५ उमेदवार बदलणार अशी चर्चा आहे. अजून पुढे अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. आमची निष्ठा महाराष्ट्राची आणि देशाची आहे. देशहित, महाराष्ट्र हित बघून आम्ही पुढे चाललोय असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय आम्ही सर्वसामान्यातले आहोत. आमच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना तरुण मंडळींना सोबत घेऊन वरिष्ठांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोय. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना-राष्ट्रवादीबाबत जो निर्णय दिला तो पाहिला तर देशात संविधान बदलण्याचे संकेत मिळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बाजूला ठेवून भाजपाचे संविधान देशावर लादायचं आहे. हे आम्ही करून देणार नाही. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक झाली. Join किंवा Jail अशी ऑफर येत आहे. त्यातून जगभरात भारताची बदनामी होतेय. ईडी, सीबीआय कारवाईतून देश बदनाम होतोय. त्यामुळे इंडिया आघाडीची वज्रमूठ बाहेर आली आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपावर केली. 

दरम्यान, आताच मिंदेंनी दिलेले उमेदवार बदलायला सांगितले आहेत, त्यातून पुढे ४० गद्दारांनी विचार करावा. महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं आहे. राज्यात असं राजकारण कधीच झालं नव्हतं, जातीधर्मात भांडणं लावली जातेय. पक्ष पोडणे, कुटुंब फोडणे यातून महाराष्ट्रात मिळवलं काय? अडीच वर्षात एकही उद्योग राज्यात आणला नाही. शेतकरी त्रस्त आहे. मग हे राजकारण कुणासाठी आणलं? आमची राज्यासाठी जी तळमळ आहे, देशात जे राजकारण सुरू आहे. ५० वर्षापूर्वी जे झाले तो इतिहास आहे, भविष्यावर बोलणार की नाही. काँग्रेसनं काय केले यावर प्रचार सुरू आहे. आपण ज्या पदावर आहोत तिथे पुढे देशासाठी काय करणार याचा विचार करायला हवा असं सांगत आदित्य ठाकरेंनी काँग्रेसवरील आरोपांना उत्तर दिले. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMNSमनसेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी