शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: मनसेवर शरद पवारांचे मोठं विधान, राज ठाकरेंबाबत पवार अजूनही आशावादी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 3:50 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात चर्चेत राहिलेला मनसेचा निकालांवर जास्त परिणाम झाला नसल्याचं जवळपास स्पष्ट झाला आहे. मनसेने सभा घेतलेल्या ठिकाणी आघाडीला मतांचा फायदा झाल्याचं दिसून येत नाही. मात्र मनसेने निवडणुकीत उमेदवार उभे केले असते तर चित्र वेगळं असतं असं शरद पवारांनी मनसेवर विश्वास दाखविला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करण्यासाठी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरे यांच्या सभांचा किती फायदा झाला यावर बोलताना शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं मात्र मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, जर त्यांनी लोकसभेत उमेदवार उभे केले असते तर बहुदा चित्र वेगळं दिसलं असतं असा अंदाज पवारांनी दिला. 

तसेच  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संपर्क ठेऊन जनाधार वाढविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करतील. रायगड, बारामती, शिरुर, सातारा या चार मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झालेली आहेत. अमरावती आणि माढ्यात अटीतटीची लढत आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने कधी जिंकला नव्हता. तिथे पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करु शकलो असं भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवारांनी दिली. तसेच मी निवडणूक लढवणार नव्हतो हे 2014 साली ठरवलं होतं. मी राज्यसभेचा सदस्य होतो. माढ्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नव्हती म्हणून मी तुमच्यात एकवाक्यता नसेल तर मी लढतो असं बोललो होतो असं पवारांनी स्पष्ट केलं. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत. अजूनही काही मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. त्याठिकाणीही काही जागांवर विजय मिळू शकतो अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस