शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
3
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
4
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
5
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
6
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
7
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
8
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
9
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
10
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
11
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
12
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
13
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
14
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
15
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
16
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
17
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
18
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
19
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
20
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:58 IST

जेव्हा विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा आघाडी बहुमत मिळवू शकत नाही, तेव्हा त्यास 'त्रिशंकू विधानसभा' म्हटलं जाते.

चेन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालात अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. विजय यांच्या पक्षाने सत्ताधारी डिएमके यांना सत्तेतून बाहेर काढले. टीव्हीके पक्षाने १०८ जागांवर घवघवीत यश मिळवले परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा ११८ बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. डिएमकेसोबत निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने राज्यात ५ जागा जिंकल्या. परंतु सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीत काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे.

मागील १ दशकापासून काँग्रेस आणि डीएमके एकत्र निवडणूक लढवत होते. मात्र यंदा ही आघाडी निकालानंतर तुटली आहे. काँग्रेसने टीव्हीकेला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. यामुळे टीव्हीकेचे संख्याबळ वाढले असले तरी बहुमतापासून अजूनही ते दूर आहेत. बहुमत मिळवण्यासाठी विजय यांनी जीएमके आघाडीसह अन्य पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे. त्याआधी टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सरकार स्थापनेचा दावा करूनही राज्यपालांनी विजय यांना सरकार बनवण्यासाठी निमंत्रण दिले नाही अशी चर्चा तामिळनाडूच्या राजकारणात सुरू आहे.

जेव्हा विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा आघाडी बहुमत मिळवू शकत नाही, तेव्हा त्यास 'त्रिशंकू विधानसभा' म्हटलं जाते. राज्यपाल जाणुनबुजून सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सरकार बनवण्यासाठी निमंत्रण देत नाहीत का असा प्रश्न उभा राहिला आहे. टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन बनवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यापैकी एक म्हणजे इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणे, केवळ काँग्रेसचा पाठिंबा पुरेसा ठरणार नाही. परिणामी प्रत्येकी दोन जागा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि सीपीआयनेही टीव्हीकेला आपला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

राज्यघटनेत काय म्हटलंय?

पूर्ण संख्याबळ दाखवल्यासच शपथविधीला परवानगी देऊ असे राज्यपाल म्हणू शकत नाहीत असं निवृत्त न्यायमूर्ती हरिपरंथमन यांनी म्हटलं. हरिपरंमथन यांनी म्हटलं की, सरकार स्थापन करण्यासाठी कोणालाही आमंत्रित करण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. जेव्हा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसते तेव्हा दावा करणाऱ्या पक्षाला आपले संख्याबळ सिद्ध करण्यास सांगणे चुकीचे नाही. परंतु त्याच वेळी पूर्ण संख्याबळ दाखवल्यासच शपथविधीला परवानगी दिली जाईल असेही म्हणता येणार नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा हेच योग्य ठिकाण आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय जर राज्यपालांचा दावा करणाऱ्या पक्षावर विश्वास असेल तर ते त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील. सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या पक्षाला राज्यपालांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे. यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केली जाऊ शकत नाही परंतु ते खूप जास्त वेळही घेऊ शकत नाहीत. सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या पक्षाला राज्यपालांची परवानगी मिळाल्यानंतर शपथविधी घ्यावा लागेल. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्र्‍यांना शपथ देतील असं सर्वोच्च न्यायालयाचे वकील कर्पका विनयगम यांनी माहिती दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu: Governor Denies Invitation Despite Meeting Vijay; Constitutional Provisions?

Web Summary : Despite TVK's strong showing in Tamil Nadu, the Governor hasn't invited Vijay to form a government. Congress offered support, but TVK still lacks a majority, prompting questions about the Governor's role and constitutional procedures in a hung assembly.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयTamilnaduतामिळनाडूAssembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६Electionनिवडणूक 2026