शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

भाजपवाले राज ठाकरेंमुळे कसे झाले बेजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:10 AM

मी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारा पहिला नेता होतो. मात्र पंतप्रधान झाल्यावर हा माणूस एवढा बदलला की, मला माझी भूमिका बदलावी लागल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले असून अनेक ठिकाणी सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा देखील महाराष्ट्र दौरा झाला आहे. यापुढेही महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे भाजपवाले चांगलेच बेजार झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदाच झाला होता. परंतु, यावेळी राज ठाकरे यांनी मोदीविरुद्ध भूमिका घेत शनिवारी घेतलेल्या मेळाव्यात मोदींचा खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला. त्यामुळे मोदींची प्रतिमा आणखी खराब होण्याच्या मार्गावर असून यामुळे भाजपवाले बेजार होणार, असं चित्र आहे.

राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मोदींवर कडाडून टीका केली. तसेच राहुल गांधी यांना एकदा संधी देऊन पाहण्याचे आवाहन केले. काँग्रेस विरोधात असल्यावर त्याचे महत्त्व कळते, असंही राज यांनी सांगितले. तसेच मी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारा पहिला नेता होतो. मात्र पंतप्रधान झाल्यावर हा माणूस एवढा बदलला की, मला माझी भूमिका बदलावी लागल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचार सभेत सैन्याचा पराक्रम आणि आम्ही सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. राज ठाकरे यांनी हाच धागा पकडून काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांना ऐकवली. त्यात, आपणच सैनिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत होते. त्यामुळे मोदी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी बाब म्हणजे, मोदींच्या बीफ निर्यातीसंदर्भातील भूमिकेसंदर्भातील क्लिप राज यांनी सर्वांना ऐकवली. त्यामुळे मोदींचा दुटप्पीपणा समोर आल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी दिलेल्या पुराव्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. २०१४ मध्ये मोदींच्या समर्थनात जशी चर्चा होती, तशी चर्चा आता मोदींच्या जुन्या क्लिपची आहे. यामुळे मोदींवर नेटकरी टीका करत आहेत. भाजपमध्ये मोदी स्टार प्रचारक आहेत. मात्र सोशल मीडियावर मोदींना होत असलेला विरोध पाहता भाजप नेत्यांच्या चितेंत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी