शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची दुसरी विशेष गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Updated: August 23, 2016 20:05 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता.

२२,२७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी,  तिसऱ्या फेरीसाठी ४० हजार ४८१ जागा शिल्लक

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश बदल देण्यात आला असून, ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेषफेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसऱ्या विशेष फेरीसाठी अकरावीच्या एकूण ६२ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील २२ हजार २७३ जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ९ हजार ९१० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, तर ३ हजार १६२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २ हजार ८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. त्यामुळे एकूण १५ हजार ८० विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालयात प्रवेश देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरी सुमारे ७ हजार १९३ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तिसऱ्या विशेष फेरीमध्ये पुन्हा अर्ज करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या तीन पसंतीक्रमातील महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसोबत दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश बदलाच्या संधीपासून वंचित राहिलेल्या ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुलै महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतरच तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यताआहे. तरी अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीसाठी अद्याप ४० हजार ४८१ जागा उपलब्ध आहेत.दहीहंडीच्या सुटीने प्रवेश वेळापत्रकात बदलजुन्या वेळापत्रकानुसार, दुसऱ्या विशेष फेरीमधील गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे बुधवार व गुरुवारी म्हणजेच २४ आणि २५ आॅगस्ट रोजी संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र राज्य शासनाने मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना गुरुवारी, २५ आॅगस्ट रोजी दहीहंडीनिमित्त सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी प्रवेश प्रक्रिया होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी २५ आॅगस्टऐवजी शुक्रवारी, २६ आॅगस्टला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखानिहाय निश्चित करण्यात आलेले प्रवेश :कला १,४४०वाणिज्य १४,३८१विज्ञान ६,४५२एकूण २२,२७३