शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना पत्र: तुम्ही बोललंच पाहिजे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 14:03 IST

...तर आज तुमच्यावर बसलेला शिक्का कदाचित बसला नसता!

ठळक मुद्देबोलणं ही तुमची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही बोलत राहिलंच पाहिजे.तुम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू शकता, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय.ईडी नोटीसमुळे कार्यकर्ते चार्ज झालेत. आता त्यांना गरज आहे, ती आदेशाची.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे,
स. न. वि. वि.

ईडीची बहुचर्चित चौकशी पूर्ण करून, तब्बल साडेआठ तास अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देऊन तुम्ही सुखरूप घरी पोहोचलात आणि तिथे 'एक ही मारा, पर सॉल्लीड मारा' टाईप्स एक 'राज'गर्जना करून मनसैनिकांना खूश करून टाकलंत. कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, असा इशारा तुम्ही सत्ताधारी भाजपाला, मोदी-शहांना दिलात. तुमच्या आडनावाला आणि स्वभावाला साजेशी अशीच ही प्रतिक्रिया आहे. बोलणं ही तुमची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही बोलत राहिलंच पाहिजे. पण काय बोललं पाहिजे, कुणासाठी बोललं पाहिजे, याचा एकदा फेरविचार तुम्ही 'मनसे' करायला हवं असं प्रामाणिकपणे वाटतं. तुमचं प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्व पाहता, हा सल्ला तुम्हाला आणि तुमच्या सैनिकांना 'शहाणपणा' वाटू शकतो. मात्र शांतपणे (जसा पवित्रा ईडी नोटीसबाबत घेतलात) विचार केल्यास ही 'मन की बात' 'मन(से) की बात' वाटेल, अशी भाबडी आशा वाटते.

पत्राच्या मायन्यात 'मनसे अध्यक्ष' असा उल्लेख मुद्दामच केला आहे. कारण, तुम्ही मनसेची भूमिका मांडताय, की अन्य कुणाची घडी बसवण्याचा प्रयत्न करताय?, असा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे. ही शंका तुमच्या भूमिकेमुळेच उद्भवली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय तुम्ही घेतला होतात, पण प्रचार मात्र अगदी जोमाने केलात. 'लाव रे तो व्हिडीओ' देशभरात गाजलं. हा खटाटोप नेमका कुणासाठी होता?, याचं समर्पक उत्तर मनसैनिकांनाही अजून समजलेलं नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात तुम्ही रान पेटवलंत. यापुढेही तुम्ही त्याच त्वेषानं  हे 'मोदी हटाओ' अभियान राबवाल. ती तुमची, तुमच्या पक्षाची भूमिका असेलही; त्यात गैर काहीच नाही. राजकीय पक्षाचा एक अजेंडा असतोच - असलाच पाहिजे, पण लोकसभेच्या प्रचारावेळी तुम्ही इतरच कुणाचा तरी अजेंडा राबवताय, असं वाटत राहिलं. कारण, मोदी-शहांना हरवण्यासाठी प्रचाराच्या मैदानात तुम्ही लढत होतात, पण तुमचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नव्हता. कुणाला मत द्या हे तुम्ही जाहीरपणे सांगत नव्हतात, पण ते न समजण्याइतके मतदार खुळे नाहीत. त्यांना मत देणं आपल्या कार्यकर्त्यांना 'मनसे' पटेल का, याचा विचार तुम्ही करायला हवा होतात. त्याऐवजी मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये - जिथे मनसेचा जास्त प्रभाव आहे याची तुम्हाला खात्री होती, अशा ठिकाणी तुमचे चार-सहा शिलेदार रिंगणात उतरले असते तर तुमचा इरादा पक्का आहे याची खात्री झाली असती आणि आज बसलेला शिक्का कदाचित बसला नसता. असंही तुम्ही डझनभर सभा घेतल्यातच, त्यासाठी काही कोटी रुपयांचा खर्च नक्कीच झाला असेल. मग तो आपल्याच उमेदवारांसाठी केला असता, तर तुम्हाला 'शत-प्रतिशत' फायदा होऊ शकला असता. २०१४ मध्ये मोदी लाट असताना, तुम्हीही मोदींच्या बाजूने असताना तुम्ही तुमचे उमेदवार रिंगणात उतरवलेत. त्यांना मतंही चांगली मिळाली. पण, २०१९ मध्ये तुम्ही निवडणुकीपासून लांब राहिलात, हे खरोखरच 'अनाकलनीय' (तुम्हाला जितका लोकसभेचा निकाल वाटतो तितकंच) आहे. 

असो. झालं ते झालं. पण, या अनुभवातून बोध घेऊन तुम्ही विधानसभा निवडणुकीची 'राजनीती' आखाल, असं वाटत असताना तुमचं 'इंजिन' वेगळ्याच दिशेला धावताना दिसतंय. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताय. पण, विरोधकांच्या एकीचं लोकसभा निवडणुकीत काय झालं आणि आता संसदेत काय होतंय, हे सगळेच बघताहेत. हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याचा तुमचा निर्णय योग्य होता. पण, त्यांच्याकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं तुम्हीच सांगताय. याआधीही शरद पवार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यापासून सगळ्यांनीच कथित 'ईव्हीएम घोटाळा' पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही. मग आता पुन्हा तोच विषय उगाळण्यात कितपत अर्थ आहे? 

उलट, ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही बोलायला लागल्यापासून एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. या मुद्द्यावरून तुम्ही विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू शकता, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय. त्यामुळे मनसैनिकांमधील संभ्रम वाढलाय. मधल्या काळात पक्षबांधणीच्या दिशेनं सुरू झालेल्या कामाचा वेगही मंदावल्याचं दिसतंय. त्यामुळे ही शंका आणखी बळावलीय. अशा वेळी तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण, लाखो कार्यकर्ते आणि शेकडो पदाधिकाऱ्यांचं राजकीय भवितव्य तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. कार्यकर्ते तर तुमच्यावर जीव ओवाळून टाकायलाही तयार असल्याचं परवा पुन्हा सिद्ध झालंय. त्यांचं शंकानिरसन करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बोललं पाहिजे, पुढची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. 

महाराष्ट्र ही माझी सीमा आहे, असं तुम्ही अभिमानानं सांगत आलात. असं असताना, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आघाडीवर असलं पाहिजे. पण, मनसेचं अजून कशातच काही दिसत नाही. ईडी नोटीसमुळे कार्यकर्ते चार्ज झालेत. ठोस मुद्दाही मिळालाय. आता त्यांना गरज आहे, ती आदेशाची. मोदी-शहांविरोधात लढायचंय, भाजपाला पाडायचंय, हे ठीक आहे. पण मनसे रिंगणात उतरून लढणार की पडद्यामागून?, स्वतःसाठी सभा घेणार की अन्य कुणासाठी?, हे तुम्ही बोलल्याशिवाय कळणार नाही. नरेद्र मोदींना झटका आला आणि त्यांनी नोटाबंदी केली, अशी टीका तुम्ही करता. पण, तुम्हीही शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांना 'झटका' देता, असं नाही का वाटत? तुम्ही माना अथवा मानू नका, पण या 'झटक्या'नेच मनसेचं 'इंजिन' ट्रॅकवरून खाली उतरलंय. विधानसभा निवडणुकीत ते रुळावर आणण्याची संधी आहे. फक्त त्यासाठी तुम्ही वेळीच बोललं पाहिजे. अन्यथा मनसैनिकांनाही म्हणावं लागेल, 'अनाकलनीय'! 

जय महाराष्ट्र!

महत्त्वाच्या राजकीय बातम्या

काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते म्हणतात, मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे चुकीचे 

महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा

‘ईडी’मुळे राज यांच्या हाती आयते कोलीत; निवडणुकीसाठी मिळाला मुद्दा

सेना-मनसे यांच्यात रंगणार मुख्य लढत, पुनर्विकास हा प्रमुख मुद्दा

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९