शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
6
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
7
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
8
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
9
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
10
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
11
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
12
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
13
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
14
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
15
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
16
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
17
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
18
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
19
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
20
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: राज्याला किती लस मिळाल्या? भाजपने थेट आकडेवारीच दिली; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 20:05 IST

Corona Vaccination: केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच भाजपने दिली आहे.

ठळक मुद्देभाजपकडून कोरोना लसींची आकडेवारी जाहीरआरोप-प्रत्यारोपांना भाजपकडून थेट उत्तर ट्विट करत दिली माहिती

मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि कोरोना लसींचा तुटवडा (corona vaccination) यांवरून गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होत असूनही मागणीप्रमाणे पुरवठा केला जात नसल्याचा आरोप सातत्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे करत असताना मात्र राज्याला जास्त लसी दिल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. आता थेट सोमवार, १२ एप्रिल रोजी केंद्राकडून महाराष्ट्राला किती लसी मिळाल्या, याची आकडेवारीच दिली आहे. (keshav upadhye gave details related to corona vaccination in the state)

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून राज्याला किती कोरोना लसींचा साठा मिळाल, राज्यात किती जणांना लस देण्यात आली आणि राज्यात कोरोना लसींचा किती साठा शिल्लक आहे, याची थेट आकडेवारीच या ट्विटमध्ये दिली आहे. यावरून राज्यातील कोरोना लसीकरणावरून केले जात असलेले दावे, चर्चा आणि आरोप यांना पूर्णविराम दिल्याचे सांगितले जात आहे. 

जाणून घेऊया आकडेवारी

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दिलेल्या आकडेवारीनुसार, १२ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्राला १ कोटी २२ लाख ४० हजार ३६० कोरोना लसींचा साठा मिळाला. राज्यात आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या १ कोटी ०५ लाख ८१ हजार ७७० इतकी असून, राज्यात शिल्लक कोरोना लसींचा साठा १६ लाख ५८ हजार ५९० इतका असल्याची माहिती उपाध्ये यांनी दिली आहे. 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

राहुल गांधीची केंद्रावर टीका

गेल्या ३८५ दिवसांत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकता आलेली नाही. उत्सव, टाळी-थाळी खूप झाले, आता देशाला लस द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली असून, आता दुसरी लाट आहे आणि लाखो जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तुम्ही इव्हेंटबाजी कमी करा, ज्या कुणाला लसीची आवश्यकता आहे त्याला ती मिळवून द्या. लसीची निर्यात बंद करा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

दरम्यान, कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाState Governmentराज्य सरकार