शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

धर्म, देवाच्या नावावर मत मागणे योग्य की अयोग्य?; ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 1:41 PM

हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.

मुंबई – देशात काही राज्यांत निवडणुका सुरू आहेत. क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तसे निवडणुकीच्या प्रचारात असतात. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, त्यात काही गोष्टींवर खुलासा करण्याची मागणी केली आहे. केवळ भाजपा सत्तेत बसलाय म्हणून त्यांना फ्री हीट द्यायची आणि आम्ही काही केले तर आमची हीट विकेट काढायची असं अनेकदा होतंय. प्रचारात धर्म, देवाच्या नावावर मते मागितली जात आहेत ते योग्य आहे की अयोग्य याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, १९८७ मध्ये विलेपार्ल्यात पोटनिवडणूक लागली होती. रमेश प्रभू हे आमचे विजयी झाले होते. ही देशातील पहिली निवडणूक होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली आणि जिंकली गेली. या निवडणुकीत भाजपाही आमच्या विरोधात होती. त्या निवडणुकीपासून अगदी १९९५ साली आमचे सरकार आले तोपर्यंत आमचे ५-६ आमदार त्यात सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, बापू खेडेकर, रमाकांत मयेकर आणि रमेश प्रभू हे बाद ठरवले गेले, परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकशाहीतला मुलभूत असलेला मतदानाचा अधिकार यांच्यासह शिवसेनाप्रमुखांचा ६ वर्षासाठी काढून घेण्यात आला होता. कारण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रचार केला, मंदिर वही बनाएंगे असं म्हटलं होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने बाळासाहेबांसोबत आमच्या नेत्यांवर कारवाई केली होती अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्याचसोबत आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आचारसंहितेत, नियमावलीत काही बदल केले अशी शक्यता वाटते. केले असतील तर ते सगळ्यांना सारखे असायला हवेत. कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय म्हणून मतदान करण्यास सांगितले होते. अमित शाह यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू. धर्म आणि देवाच्या नावावर मतदान मागणे हे आचारसंहितेत बसत की नाही? जर बसत असेल तर आम्ही देखील पुढच्या निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून मतदान मागू. आचारसंहितेत जर निवडणूक आयोगाने बदल केला असेल तर तो कधी केला याबाबत कळवावे. आताही निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना या निर्णयाबाबत अवगत करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान, गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ६ वर्ष मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगानं आचारसंहितेत बदल केले असावेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे. भाजपाचा कारभार रामभरोसे चालला आहे. मी राजकारण आणू इच्छित नाही. जो प्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे की बरोबर हे निवडणूक आयोगाने कळवावे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेHindutvaहिंदुत्वNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग