शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 10:27 AM

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील प्रचार सुरू आहे. ४ जूनला देशाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती असतील याची प्रतिक्षा सर्वांना लागून राहिली आहे. 

नवी दिल्ली - सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपाच्या मतांमध्ये प्रत्येक निवडणुकीत वाढ होतेय. २००९ मध्ये मतांची टक्केवारी १९ टक्के होती. २०१४ मध्ये हा आकडा ३४ टक्क्यांवर आला. २०१९ च्या निवडणुकीत ३७.५ टक्के मते भाजपाला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी ४२ टक्के किंवा त्याहून अधिक वाढतील. मी १२ राज्यांचा दौरा केला आहे. सर्व क्षेत्रातील विविध वयातील लोकांसोबत बोललोय. भाजपाचं ३७० चं टार्गेट सहज आलं नाही. त्यामागे विचार आणि विश्लेषण केलंय असं केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.

एस जयशंकर म्हणाले की, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये मतांची टक्केवारी आणि लोकसभेच्या जागा वाढतील. भाजपा अत्यंत प्रोफेशनल आणि गांभीर्याने विचार करणारा पक्ष आहे. केवळ अंदाज लावत नाही. भाजपा त्यांच्या मतदारसंघात बूथपर्यंत आढावा घेते. आमची रणनीती बूथवरील फॅक्टसवर असते. त्यामुळे जर कुणी काही विशेष राज्यात मते आणि जागा वाढतील बोलत असेल तर त्यावर विश्वास करू शकतो असं लॉजिक त्यांनी मांडलं. 

तसेच पंतप्रधान मोदींनी ४०० पार नारा असाच दिला नाही. काहीतरी विचार असेल, अनेक अशी राज्यं आहेत जिथे भाजपा त्यांची ताकद आणखी मजबूत करणार आहे. आम्हाला मागच्या वेळी जितक्या जागा मिळाल्या त्याहून अधिक जागा तिथे मिळतील. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, यूपी आणि तामिळनाडू या राज्यात आमच्या जागांमध्ये वाढ होईल असा विश्वास एस जयशंकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकीकडे भारताच्या विकासाचं स्वप्न आम्ही दाखवत आहोत तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील पक्ष लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. मोदी सरकारच्या मागील १० वर्षात फक्त ट्रेलर होता आणि हे विधान हलक्यात कुणी घेऊ नये. जनतेसमोर भाजपाच्या १० वर्षाचा रेकॉर्ड आहे आणि भविष्यातील सकारात्मक प्रतिमा आहे. त्यामुळे आम्हाला किती जागा मिळतील याचा आकडा मी सांगू शकत नाही परंतु तो नक्कीच जास्त असेल असं आत्मविश्वासानं मी सांगू शकतो असंही एस जयशंकर यांनी म्हटलं.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकर