शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 1:29 PM

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित केले. 

चंदिगड - Narendra Modi on Congress ( Marathi News ) शीख समुदायासाठी भावनेचा मुद्दा असलेल्या करतारपूर कॉरिडोर भारतात नसल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटियाला येथील जाहीर सभेत खंत व्यक्त केली. जर १९७१ च्या युद्धात विजयी झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारनं योग्य बोलणी केली असती तर करतारपूर साहिब भारताचा हिस्सा असतं असं त्यांनी म्हटलं. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात ९० हजाराहून अधिक पाक सैन्यानं आत्मसमर्पण केलं होतं. जर त्यावेळी आम्ही सत्तेत असतो तर पाकिस्तानी सैन्याच्या सुटकेअगोदार करतारपूर साहिब भारतात घेतलं असतं असं मोदींनी म्हटलं आहे.

१९७१ च्या युद्धावेळी काय घडलं?

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून १९७० च्या सुरुवातीला पूर्व पाकिस्तानातील शरणार्थी भारतात येत होते. त्यावेळी बांग्लादेशाच्या मागणीसाठी आवामी लीगचे नेते शेख मुजीबुर्रहमान यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात मोर्चा उघडला होता. शरणार्थींची वाढती संख्या पाहता भारतानं त्यात हस्तक्षेप केला त्यामुळे पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. डिसेंबर १९७१ मध्ये १३ दिवसांसाठी संघर्ष चालला. त्यात भारतीय लष्कराकडून ९३ हजार पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांवर सरेंडर करण्याची वेळ आणली. 

१६ डिसेंबरला जनरल नियाजी यांनी आत्मसमर्पण पत्रकावर सही केली आणि नव्या बांग्लादेशाच्या निर्मितीसह पाकिस्तानी सैन्याची सुटका करण्यात आली. जवळपास ६ महिन्यानंतर जुलै १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पीएम जुल्फिकार अली भुट्टो यांच्या शिमला करार झाला. विजयानंतर भारताने लाइन ऑफ कंट्रोलला सप्टेंबर १९७१ च्या स्थितीला मान्यता दिली. या करारात दोन्ही देश काश्मीरसह द्विपक्षीय प्रकरणी कुठल्याही मध्यस्थताशिवाय सोडवण्यावर सहमती बनली. तज्ज्ञांच्या मते, या करारात भारतानं अशी कुठलीही अट ठेवली नाही ज्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला असता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतारपूर साहिबचा उल्लेख करत एकाच दगडात २ निशाणे साधले आहेत. त्यात पहिले शीख मतदारांना आकर्षिक करणे आणि दुसरे काँग्रेसला या मुद्द्यावरून घेरणं. 

दरम्यान, भाजपा पहिल्यांदाच पंजाबमध्ये १३ लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढत आहे. त्याचं कारण पंजाबमधील बहुतांश जागांवर चौरंगी लढत होत आहे. १९९८ ते २०१८९ पर्यंत शिरोमणी अकाली दलसोबत भाजपा विधानसभा, लोकसभा लढत आली. आघाडीत भाजपाला ४ जागा मिळत होत्या. २००४ मध्ये भाजपाचे सर्वाधिक ४ खासदार होते. २००९ मध्ये केवळ १ जागा आणि १० टक्के मते मिळाली. २०२२ च्या विधानसभेत भाजपाला केवळ २ जागा आणि ६.६ टक्के मते पडली. हिंदुत्ववादी पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर येत भाजपानं या निवडणुकीत अकाली दल, काँग्रेस आणि आपच्या शीख नेत्यांना पक्षात घेतले. ३ जागांवर महिला उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये विजयासाठी भाजपाला १० टक्क्यांहून अधिक मतांची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024