शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:30 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित केले. 

चंदिगड - Narendra Modi on Congress ( Marathi News ) शीख समुदायासाठी भावनेचा मुद्दा असलेल्या करतारपूर कॉरिडोर भारतात नसल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटियाला येथील जाहीर सभेत खंत व्यक्त केली. जर १९७१ च्या युद्धात विजयी झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारनं योग्य बोलणी केली असती तर करतारपूर साहिब भारताचा हिस्सा असतं असं त्यांनी म्हटलं. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात ९० हजाराहून अधिक पाक सैन्यानं आत्मसमर्पण केलं होतं. जर त्यावेळी आम्ही सत्तेत असतो तर पाकिस्तानी सैन्याच्या सुटकेअगोदार करतारपूर साहिब भारतात घेतलं असतं असं मोदींनी म्हटलं आहे.

१९७१ च्या युद्धावेळी काय घडलं?

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराला कंटाळून १९७० च्या सुरुवातीला पूर्व पाकिस्तानातील शरणार्थी भारतात येत होते. त्यावेळी बांग्लादेशाच्या मागणीसाठी आवामी लीगचे नेते शेख मुजीबुर्रहमान यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात मोर्चा उघडला होता. शरणार्थींची वाढती संख्या पाहता भारतानं त्यात हस्तक्षेप केला त्यामुळे पाकिस्तानकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. डिसेंबर १९७१ मध्ये १३ दिवसांसाठी संघर्ष चालला. त्यात भारतीय लष्कराकडून ९३ हजार पाकिस्तानी सैन्य आणि रझाकारांवर सरेंडर करण्याची वेळ आणली. 

१६ डिसेंबरला जनरल नियाजी यांनी आत्मसमर्पण पत्रकावर सही केली आणि नव्या बांग्लादेशाच्या निर्मितीसह पाकिस्तानी सैन्याची सुटका करण्यात आली. जवळपास ६ महिन्यानंतर जुलै १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पीएम जुल्फिकार अली भुट्टो यांच्या शिमला करार झाला. विजयानंतर भारताने लाइन ऑफ कंट्रोलला सप्टेंबर १९७१ च्या स्थितीला मान्यता दिली. या करारात दोन्ही देश काश्मीरसह द्विपक्षीय प्रकरणी कुठल्याही मध्यस्थताशिवाय सोडवण्यावर सहमती बनली. तज्ज्ञांच्या मते, या करारात भारतानं अशी कुठलीही अट ठेवली नाही ज्यामुळे पाकिस्तान कमकुवत झाला असता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतारपूर साहिबचा उल्लेख करत एकाच दगडात २ निशाणे साधले आहेत. त्यात पहिले शीख मतदारांना आकर्षिक करणे आणि दुसरे काँग्रेसला या मुद्द्यावरून घेरणं. 

दरम्यान, भाजपा पहिल्यांदाच पंजाबमध्ये १३ लोकसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढत आहे. त्याचं कारण पंजाबमधील बहुतांश जागांवर चौरंगी लढत होत आहे. १९९८ ते २०१८९ पर्यंत शिरोमणी अकाली दलसोबत भाजपा विधानसभा, लोकसभा लढत आली. आघाडीत भाजपाला ४ जागा मिळत होत्या. २००४ मध्ये भाजपाचे सर्वाधिक ४ खासदार होते. २००९ मध्ये केवळ १ जागा आणि १० टक्के मते मिळाली. २०२२ च्या विधानसभेत भाजपाला केवळ २ जागा आणि ६.६ टक्के मते पडली. हिंदुत्ववादी पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर येत भाजपानं या निवडणुकीत अकाली दल, काँग्रेस आणि आपच्या शीख नेत्यांना पक्षात घेतले. ३ जागांवर महिला उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये विजयासाठी भाजपाला १० टक्क्यांहून अधिक मतांची गरज आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024