शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीला प्राधान्य

By admin | Updated: July 10, 2014 23:04 IST

करांचा बोजा वाढणार नाही याची घेतलेली दक्षता या निर्णयांबरोबरच उद्योगविश्वाकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले.

पुणो : पुण्यासह राज्यात होणा:या आयआयएम सारख्या संस्था, उद्योगांसाठी केलेल्या भरीव तरतुदी, आयटीला दिलेली चालना, संरक्षणदलासाठी वाढविलेले बजेट, कर रचनेत बदल करताना सर्वसामान्य करदात्यांची घेतलेली काळजी, त्याबरोबरच करांचा बोजा वाढणार नाही याची घेतलेली दक्षता या निर्णयांबरोबरच उद्योगविश्वाकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले.
 
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, अॅग्रीकल्चर अॅंड इंडस्ट्रीज’च्या विविध समित्यांच्या प्रमुखांनी केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. त्याचवेळी काही मागण्याही करण्यात आल्या. मराठा चेंबरचे अध्यक्ष एस. के. जैन, उपाध्यक्ष विक्र म साळुंखे, महासचिव अनंत सरदेशमुख, खजिनदार चंद्रशेखर चितळे, ब्रिगेडियर एस. डी. घोरपडे, फर्टिलायझर इंडस्ट्रिज समितीचे अजय मेहता, संगणकतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ऑटो विभागाचे शैलेंद्र गोस्वामी, विदेशी गुंतवणूक विभागाचे पी. सी. नाम्बियार, कर विभागाचे वामन पारखी, कररचना विभागाचे गोविंद पटवर्धन यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
4जैन म्हणाले, वित्तीय तूट भरून काढण्यासंदर्भात बजेटमध्ये घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहेत. करासंदर्भात विशेष बदल करण्यात आले नाहीत. मात्र, सर्वसामान्य करदाते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढविलेली करपात्र उत्पन्नाची मर्यादा योग्य आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे त्यांना आपला व्यवसाय वाढविण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
 
4सरदेशमुख म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेरो-शायरी नव्हती, त्यामुळे तो गांभीर्याने तयार केला असल्याचे दिसून येते. पायाभूत सुविधा वाढविणो, उत्पादन क्षेत्रला गती देणो, शिक्षण, कृषी यादृष्टीने अनेक तरतुदी अभिनव आहेत. मात्र, शहरी भागाच्या विकासासाठी केलेली तरतूद स्वागतार्ह आहे, मात्र ती पुरेशी नाही.
 
4चितळे म्हणाले, गृहकर्जाची वाढविलेली मर्यादा स्वागतार्ह आहे. कररचनेत करण्यात आलेले बदल लागू करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवी प्रणाली स्विकारण्यासाठी वेळ मिळू शकेल.
 
गोस्वामी म्हणाले, ऑटो उद्योगांसाठी बजेट स्वागतार्ह आहे. एक्साईज डय़ुटी प्रणाली सुधारण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. जीएसटीचा बजेटमध्ये उल्लेख करण्यात आला नाही. पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही उल्लेख नाही. 
 
मेहता म्हणाले, देशाच्या अर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब आजच्य बजेटमध्ये उतरले आहे. बहुतेक सर्व तरतुदींमध्ये खासगी आणि सार्वजनिक उद्योगांना सहभागी करून घेण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे, प्रगतीचा फायदा या उद्योगांनाही होणार आहे. थोडक्यात केंद्र सरकारने त्यांना आपल्या अर्थिक प्रगतीमध्ये सामावून घेतले आहे.
 
अर्थसंकल्प तयार करण्याचे जे सूत्र आहे. त्या सूत्रनुसार सामान्य नागरिकांना पूर्णपणो दिला देणो शक्य नाही. त्यामुळे अपेक्षा पूर्ण न करणारा हा अर्थ संकल्प आहे. परंतु, युपीए शासनाप्रमाणोच मोदी सरकारने  अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आहे. अर्थसंकल्पात मरदसांमधील शाळांच्या विकासासाठी तरतुद केली गेली आहे. त्यामुळे मोदी सरकार आल्यावर मुस्लिमांकडे दूर्लक्ष होईल हा गैरसमज दूर झाला आहे . 
- पी.ए. इनामदार,अध्यक्ष,महाराष्ट्र कॉस्मोपोलटन एज्युकेशन सोसायटी. 
 
शिक्षण क्षेत्रत अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न होतील असे वाटले होते.परंतु पहिले पाढे पन्नास अशीच परिस्थिती आहे. कौशल्यावर आधारित शिक्षणाला अधिक भर देणो गरजेचे आहे. मात्र, शिक्षण क्षेत्रसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनकच आहे.
- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ