शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवा

By admin | Published: July 05, 2017 4:10 AM

महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद (जि. औरंगाबाद) : महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. सध्या वृक्षारोपण हा सरकारी उपक्रम राहिला नसून, एक लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे झाडे कापणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणाऱ्यांची संख्या वाढवा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.दौलताबादजवळील अब्दीमंडी गावाच्या वनक्षेत्रातील ६५ हेक्टर क्षेत्रावर संरक्षण मंत्रालय व राज्य वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा शुभारंभ तसेच ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंर्तगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यावेळी ते बोलत होते.मंगळवारपर्यंत राज्यात २ कोटी १९ लक्ष १५ हजार २९६ वृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद विभागामध्येही ४५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनविभागाने हॅलो फॉरेस्ट १९२६ हा टोल फ्री नंबर सुरू केला असून, कुठेही अवैध वृक्षतोड किंवा वन्यप्राण्यांची कत्तल होत असेल, तर या नंबरवर संपर्क साधल्यास वन विभाग त्वरित कारवाई करील, अशी माहिती वनमंत्र्यांनी यावेळी दिली.बुके नव्हे, रोप भेट द्यावन विभागाने यानंतर कुठल्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छ किंवा बुके न देण्याची संकल्पना आणली असून, पुष्पगुच्छऐवजी वृक्षाचे रोप किंवा वन विभागाशी संबंधित पुस्तक द्यावे, अस आवाहन मुनगंटीवार यांनी केले.मराठवाड्यात केवळ४.९० टक्के वनक्षेत्रमराठवाड्यात सध्या केवळ ४.९० टक्के वनक्षेत्र आहे. औरंगाबादसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील वन परिक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात लष्कराच्या मदतीने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.