शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीपेक्षाही वरचढ ठरला ग्रामस्थांचा आव्वाज

By admin | Updated: May 21, 2015 00:12 IST

भुर्इंजमध्ये भावनांचा उद्रेक : कर्णकर्कश आवाजाला कंटाळून ग्रामसभेत घेतला बंदीचा निर्णय-- गूड न्यूज.

भुर्इंज : डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या भुर्इंज ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभा घेऊन गावात डॉल्बीला बंदी करण्याचा निर्णय घेऊन डॉल्बीचा आवाज बंद केला. विशेष म्हणजे ग्रामसभेला नेहमी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ग्रामस्थ उपस्थित असतात. मात्र, डॉल्बीबंदीसाठी बोलाविण्यात आलेल्या सभेला शेकडो ग्रामस्थांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भुर्इंजमध्ये तीन मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत दररोज याठिकाणी विवाहसोहळे पार पडत असतात. भुर्इंज येथील नाक्यापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या नवरदेवाच्या मिरवणुकीत वाजणाऱ्या डॉल्बीमुळे या मार्गावरील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. विशेषत: लहान मुले, वृद्ध व रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामसभा घेऊन डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्यात आला. सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी डॉल्बी बेकायदा असल्याचे सांगून यापुढे डॉल्बीला गावात अटकाव केला जाईल, असे सांगितले. भुर्इंज ग्रामस्थांच्या संतप्त भावनांची दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यानेच यापुढे गावात डॉल्बी अजिबात वाजू देणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.ग्रामपंचायत सदस्य चंद्रदीप भोसले यांनी या निर्णयास ग्रामस्थांनी जो पाठिंबा दिला तो आनंददायी आहे. त्यामुळेच भुर्इंजसारख्या मोठ्या गावात हा निर्णय झाल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत माधवराव, मदन शिंदे, चंद्रलेखा भोसले, मधुकाका भोसले, शेखर मोरे, विजय गाडे, कृष्णराव जाधव, भाऊसाहेब जाधवराव, अतुल जाधवराव, सुमित सूर्यवंशी, सदाभाऊ रोकडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ दगडे, विजयमाला सूर्यवंशी, संजीवनी दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मंगल कार्यालय मालकांचाही पाठिंबाविशेष म्हणजे लग्नाच्या वरातीसाठी घोडे देणाऱ्या व मंगल कार्यालय मालकांनीही भुर्इंजकरांच्या डॉल्बीबंदीला पाठिंबा दिला आहे. तसेच ज्या लग्नात डॉल्बी नसेल त्यांनाच वरातीसाठी घोडा व मंगल कार्यालय देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तातडीने अंमलबजावणीभुर्इंज गावातील युवा उद्योजक विनित खरे याचा विवाह भुर्इंजमध्ये होणार आहे. या सोहळ्यात आपण डॉल्बी वाजविणार नाही, असे सभेतच जाहीर केले. त्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.