शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

मी देशाचा सदैव ऋणी राहीन!

By admin | Updated: May 17, 2014 22:36 IST

कठीण काळात सलग 1क्वर्षे समर्थपणो नेतृत्व केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग शनिवारी कृतार्थ भावनेने पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.

कृतार्थ मनमोहन सिंग यांचे अखेरचे भाषण : जगाला दिशा दाखविण्याचे सामथ्र्य भारतात
 
कठीण काळात  सलग 1क्वर्षे समर्थपणो नेतृत्व केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग शनिवारी कृतार्थ भावनेने पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. राष्ट्रपतींकडे आपल्या सरकारचा राजीनामा सुपूर्द करण्याआधी डॉ. सिंग यांनी आपल्या मितभाषी स्वभावाला साजेसे असे राष्ट्राला उद्देशून अखेरचे भाषण केले व देशवासीयांनी दिलेल्या उदंड प्रेमाबद्दल आभार मानले. महान राष्ट्र म्हणून जगाला दिशा दाखविण्याचे सामथ्र्य भारतामध्ये निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त करीत असतानाच त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी त्यांनी सत्तेवर येणा:या नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या.
आयुष्याची 6क् वर्षे देशसेवेसाठी वेचलेल्या डॉ. सिंग यांनी सार्वजनिक जीवनातून  ‘एक्ङिाट’ घेण्यापूर्वी केलेले हे शेवटचे भाषण असे:
‘माङया प्रिय देशवासीयांनो, भारताचा पंतप्रधान या नात्याने मी आपणास हे शेवटचे संबोधित करीत आहे. दहा वर्षापूर्वी ही जबाबदारी माङयावर सोपविली गेली तेव्हा चिकाटी हे साधन हाती घेऊन, मार्गदर्शनासाठी सत्यरूपी प्रकाशशलाका समोर ठेवून व नेहमी हातून योग्य तेच काम होण्याची प्रार्थना मनी ठेवून मी या कामाला सुरुवात केली होती.
आज मी पायउतार होत आहे, पण परमेश्वराकडून दिल्या जाणा:या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करीत असताना, जनतेने दिलेल्या पदावर बसणा:या प्रत्येकाला व सरकारांनाही जनतेच्या दरबारातील निकालास सामोरे जावे लागते, याची मला कल्पना आहे.
देशवासीयांनो, तुम्ही दिलेला निकाल आमच्यापैकी प्रत्येकाला शिरसावंद्य आहे. नुकत्याच संपलेल्या निवडणुकांनी आपल्या लोकशाहीचा पाया अधिकच भक्कम झाला आहे.
याआधीही मी अनेक वेळा म्हटल्याप्रमाणो, माङो जीवन व सार्वजनिक पदावरील कार्यकाळ हे खुले पुस्तक आहे. या आपल्या महान राष्ट्राची होता होईतो सेवा करण्याची मी शिकस्त केली आहे. गेल्या दहा वर्षात एक राष्ट्र म्हणून आपण अभिमान वाटावा असे यश व उपलब्धी अनेक बाबतीत साध्य केली आहे. आज भारत अनेक बाबतीत, दहा वर्षापूर्वी होता त्याहून कितीतरी अधिक बलवान राष्ट्र झाला आहे. या सर्व यशाचे श्रेय तुमचेच आहे. पण तरीही या देशात अजूनही कितीतरी विकासक्षमता सुप्तावस्थेत आहे व ती वापरण्यासाठी आपण सर्वानी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.
पदावरून दूर होताना, तुम्ही दिलेले प्रेम व ममत्वाच्या स्मृती माङया मनात चिरकाल राहतील. मला आयुष्यात जे काही मिळाले ते सर्व या महान देशानेच दिलेले आहे. फाळणीने पोळलेल्या माङयासारख्या उपेक्षित व्यक्तीला प्रगती करून उच्च पद भूषविण्याचे बळ याच देशाने दिले. देशाचे माङयावरील हे ऋण कधीही फेडता न येणारे तर आहेच; पण जे कायम एक अलंकार म्हणून मिरवावे असेही आहे. मित्रंनो, मला भारताच्या भवितव्याबद्दल उदंड विश्वास आहे. उदयोन्मुख जागतिक अर्थव्यवस्थेचे ऊर्जास्थान म्हणून भारताने भूमिका बजावण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असे माङो ठाम मत आहे. परंपरा व आधुनिकता आणि एकता व विविधता यांचा मेळ घालून आपला देश जगाचा मार्गदर्शक ठरू शकतो. या देशाची सेवा करता आली हे मी भाग्य समजतो. माझी याहून जास्त काही अपेक्षाही नाही. नव्या सरकारला त्यांच्या कामात मी सुयश चिंतितो व आपल्या देशास उत्तरोत्तर यश मिळत राहो, अशी प्रार्थना करतो.
धन्यवाद, जयहिंद.
 
-सखोल अध्ययन व दूरदृष्टीने आर्थिक क्षेत्रत आपल्या कर्तृत्वाचे मानदंड निर्माण करणा:या डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद एक दशक सांभाळल्यानंतर शनिवारी त्याचा राजीनामा दिला. 
- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दुस:यांदा पंतप्रधान बनण्याचा मान फक्त डॉ. सिंग यांच्याच वाटय़ाला आला. संपुआ सरकारच्या दोन मोठय़ा घोटाळ्यांचा परिणाम त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कामावर मात करणारा ठरला.
-1991 साली देश आर्थिक संकटातून वाटचाल करीत होता तेव्हा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. सिंग यांची अर्थमंत्री म्हणून वर्णी लागली. त्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढले. 
-सहकारी पक्षांच्या विरोधाला तोंड देत अमेरिकेसोबत अणुऊर्जा करार करून त्यांनी भारताविरुद्ध लागलेल्या र्निबधांना संपविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. 
-सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर डॉ. सिंग हे पहिले शीख पंतप्रधान बनले. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी शपथ दिली होती.